शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागातील दुष्काळ हटेना

By admin | Updated: September 13, 2016 01:22 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागाच्या नशिबी असणारी दुष्काळाची पीडा मागील पाच वर्षांपासून हटेना.

बारामती / मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाच्या नशिबी असणारी दुष्काळाची पीडा मागील पाच वर्षांपासून हटेना. पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असणाऱ्या या परिसरात पुरंदर व जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना वाजत-गाजत आणल्या गेल्या. मात्र या सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने आजही या पसिरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. सध्या जनाई-शिरसाई योजनेतून सुपे परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी जिरायती भागाला पावसाने हुलकावणी दिली. सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ११ हजार हेक्टरवर पेरण्या केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने बाजरी व चारापिकांचे क्षेत्र अधिक होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून पावसाने या भागात तोंड दाखवले नाही. त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेला. यानंतर येणारा रब्बी हंगामदेखील शेतकऱ्यांना तारणार का, या चिंतेत सध्या येथील शेतकरी आहे. तालुक्याच्या पश्चिम भाग कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या जोगवडी, आंबी, मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोराळवाडी, लोणी भापकर, सायबाचीवाडी, मोडवे, जळगाव, भिलारवाडी आदी गावे लाभक्षेत्रात येतात. मागील दोन वर्षांपूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेचे उद्घाटन केले. परंतु या योजनेचे पाणी तालुक्याच्या जिरायती भागात केवळ उद्घाटनापुरतेच, तर बहुतांश योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. या भागातील गावांना टंचाई निवारण निधीतून या योजनेचे वीजबिल भरण्यासाठी जिरायती भाग पाणी परिषद व शेतकऱ्यांनी जनावरांसहित तरडोली येथे २ जुलै रोजी आंदोलन केले. मात्र तरीही येथील जनता शेतीसाठी पाणी पाणी करीत आहे. यामुळे जनतेच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी सहा गावांतील मूठभर लोकांसाठी पाणी सोडले जाणार आहे. खरीप तर गेलाच, पण रब्बीची पेर तरी या आशेवर शेतकरी आहेत. यासाठी शेतकरी नेहमीसारखी पुरंदर उपसा सिंचनच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)