शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

दुष्काळासह अवकाळीचे संकट

By admin | Updated: March 8, 2016 01:08 IST

परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे

वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावरील होणारा खर्च याचा काहीच ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीमधून काहीच उत्पन्न घेता आले नाही. तर अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतातील पिके मातीमोल होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. वडापुरी, अवसरी, सुरवड, काटी, रेडा, रेडणी, वरकुटे, अभंगवस्ती, राऊतवस्ती, पंधारवाडी या परिसरात खरिपाबरोबरच रब्बीचे उत्पादन कमी प्रमाणात निघाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना लागणारा चारा कोठून आणावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. विहिरींनी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. शेतात कामच नसल्याने मजुरांना रोजगारच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)कमी दूधदराने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळले होते. परंतु, दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन कमी करण्यात येत आहे. तसेच दुधाला सध्या मिळणारा दरही अल्प आहे. दुधाचा उत्पादन खर्च आणि दूधदरामधील तफावत यामुळे दुग्धव्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुधन बाजारात विक्रीला जात आहे. भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे. भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे.