शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वीसगाव खोऱ्यातील गावांत धोमचे पाणी पोहोचेना

By admin | Updated: May 12, 2017 04:43 IST

भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी वीसगाव खोऱ्याला मिळण्यासाठी धोम-बलकवडी डावा कालवा पाच वर्षांपूर्वी डोंगर पोखरून काढण्यात आला़ मात्र, या पाण्याचा उपयोग वीसगावच्या पश्चिमेकडील गावांना होत असून, वीसगावाना पाणी असूनही ते मिळत नसल्याने ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे़धोम-बलकवडी डावा कालवा आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव व कर्नावड गावच्या शेजारील दोन डोंगर फोडून वीसगाव खोऱ्यातून पश्चिमेकडे नेलेला आहे़ या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना पाणी परवाना मिळाला नसल्याने उपयोग होत नाही़ या कालव्याला गोकवडी येथील उंबरीची ओव्होळ येथे मोठ्या प्रामाणावर गळती आसल्याने कालव्या खालील अनेक शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर शेती नापीक झाली आहे़ हा कालवा पाले, पळसोशी, वरवडी, आंबाडे, नेरे, बालवडी या गावांशेजारून गेला आसला, तरी बारामाही या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ यातील काही गावांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे़ धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडले तरी ही गावे उंचवट्यावर असल्याने पिण्याचे पाणी मिळत नाही़ या उन्हाळ्याच्या दिवसात या गावांची अतिशय गंभीर स्थितीती असून, पाण्यासाठी महिलांना, नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते.कालव्या खालील गावांना तुरळक प्रमाणात पाणी मिळत असते़ या परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वीसगाव खोरे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़