शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

पालिकेच्या बांधकामाला पिण्याचे पाणी

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा

पुणे : शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात महापालिकेकडूनच पाण्याची मोठी नासाडी केली जात असताना ते शहरातील इतर बांधकामांवरील पाण्याच्या गैरवापरावर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वॉशिंग सेंटरसाठी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून त्यांनी गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे. महापालिका मुख्य इमारतीच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी उघडपणे नळाला पाइप जोडून त्यातून पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात आहे. महापालिकेकडूनच पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्याचे उजेडात आल्याने पालिका प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणातील पाण्याचा साठा वेगाने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ जुलै २०१६ पर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ऋषिकेश बालगुडे यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.मुख्य इमारतीबरोबर शहरामध्ये उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात आहे. महापालिकेच्या हेल्पलाइनवर येणाऱ्या पाण्याच्या गैरवापराच्या तक्रारींनुसार कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. मात्र पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आयुक्तांनी नेमलेली भरारी पथके केवळ नावालाच उरली आहेत.पाालिकेवर कारवाई केव्हा?महापालिकेकडून वॉशिंग सेंटर, सोसायट्या, वस्त्या इथे पाण्याचा गैरवापर करण्याच्या तक्रारी हेल्पलाइनवर आल्यानंतर त्यानुसार शहानिशा करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या इमारतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याची लेखी तक्रार येऊनही त्याविरुद्ध अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. रस्त्यांचे काम बंद ठेवाशहरामध्ये सध्या ठिकठिकाणी चांगले डांबरी रस्ते खोदून सिमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. सिमेंटच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे ऐन पाणीटंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पावसाळ््यापर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम बंद ठेवावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या भरारी पथकांचे अस्तित्व केवळ नावालाचशहरामध्ये एक दिवसाआड पाणीकपात लागू करण्यात आल्यानंतर पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी भरारी पथकांची स्थापना केली होती. मात्र या भरारी पथकांचे अस्तित्व केवळ नावालाच उरले आहे. महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरून येणाऱ्या तक्रारींनंतर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नागरिकांना तक्रार नोंदविता येते.महापालिकेच्या विस्तारित इमारतीसाठी खोदकाम केल्यानंतर जिवंत झरा लागला आहे, त्या झऱ्याचे पाणी इमारतीच्या बांधकामासाठी वापरले जात आहे.-व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख