शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणी पिणेदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

डमी १२१० पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही ...

डमी १२१०

पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही लागली तरी पाणी पिले जाते. दररोज तीन लिटर पाणी पिलेच पाहिजे का? असे अनेक गैरसमज पसरलेले असून, त्यामुळे नेमके किती पाणी प्यावे याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. तहान लागली की पाणी प्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळी उठल्यावर अनेकजण पोट साफ व्हावे, म्हणून भरपूर पाणी पितात. खरंतर सकाळी आपोआप पोट साफ होणे हे जास्त योग्य असते. जे आदल्या दिवशी घेतलेला आहार, पाणी व व्यायाम या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जेव्हा सकाळी सकाळी आपण तांब्याभर पाणी पितो तेव्हा पाण्याच्या दबावाने आतड्यांची हालचाल सुरू होते व पोट साफ व्हायला मदत होते. पाणी गरम असेल तर पोट आणखी लवकर साफ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर अन्न पचनासाठी जास्त वेळ लागेल. अन्न पचनासाठी आवश्यक असलेला अग्नि हा मंद होईल. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नये. पोटाचे चार भाग करून आपणच दोन भाग अन्न, एक भाग पाणी व एक भाग हवेसाठी मोकळा ठेवावा तरच तुमचे अन्नपचन नीट होईल, असे आयुर्वेद तज्ज्ञ मनोज भांगडे यांनी सांगितले.

———————————————

पाण्याची शरीराला का असते गरज?

- शरीराचे तापमान नियंत्रित करणे.

- सांध्यामध्ये घर्षण कमी करणे.

- मेंदूचे पोषण करणे.

- रोज शरीरातून पाणी मल, मूत्र, घाम व श्वासाद्वारे शरीराबाहेर पडते. तेव्हा ही तूट भरून काढणे

———————-

गरजेपेक्षा कमी प्यायलो तर काय होईल?

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर सर्वात प्रथम मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. डिहायड्रेशन होते. आपण पाणी कमी प्यायलो तर लघवीचा रंग पिवळसर होतो. त्यामुळे अशी लघवी झाल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.

- शरीराची काम करण्याची शक्ती कमी होते.

- मानसिक शक्ती कमी होते अन् निरुत्साही वाटते.

- त्वचा कोरडी पडायला लागते, रक्तदाब कमी होतो.

————————————————

प्रत्येकाची पाणी पिण्याची गरज वेगळी असते. तहान लागली तरच पाणी प्यायले पाहिजे. एखाद्याला हृदयाचा त्रास असेल तर अधिक पाणी पिल्याने हृदयावर खूप ताण येईल. जर कोणाला लघवीला अडचण येत असेल आणि त्याने अधिक पाणी प्यायले तर ते तुंबून त्रास वाढेल. एखाद्याला मूतखडा नेहमी होत असेल तर त्याला अधिक पाणी प्यायला सांगितले जाते. पण, सरसकट सर्वांनी खूप पाणी पिऊ नये. भूक लागल्यावर पाणी पितो अगदी तसेच तहान लागली की पाणी प्यावे.

- डाॅ. शिरीष भावे, यूरोलाॅजिस्ट

—————————————————