शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणी पिणेदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

डमी १२१० पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही ...

डमी १२१०

पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही लागली तरी पाणी पिले जाते. दररोज तीन लिटर पाणी पिलेच पाहिजे का? असे अनेक गैरसमज पसरलेले असून, त्यामुळे नेमके किती पाणी प्यावे याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. तहान लागली की पाणी प्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळी उठल्यावर अनेकजण पोट साफ व्हावे, म्हणून भरपूर पाणी पितात. खरंतर सकाळी आपोआप पोट साफ होणे हे जास्त योग्य असते. जे आदल्या दिवशी घेतलेला आहार, पाणी व व्यायाम या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जेव्हा सकाळी सकाळी आपण तांब्याभर पाणी पितो तेव्हा पाण्याच्या दबावाने आतड्यांची हालचाल सुरू होते व पोट साफ व्हायला मदत होते. पाणी गरम असेल तर पोट आणखी लवकर साफ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर अन्न पचनासाठी जास्त वेळ लागेल. अन्न पचनासाठी आवश्यक असलेला अग्नि हा मंद होईल. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नये. पोटाचे चार भाग करून आपणच दोन भाग अन्न, एक भाग पाणी व एक भाग हवेसाठी मोकळा ठेवावा तरच तुमचे अन्नपचन नीट होईल, असे आयुर्वेद तज्ज्ञ मनोज भांगडे यांनी सांगितले.

———————————————

पाण्याची शरीराला का असते गरज?

- शरीराचे तापमान नियंत्रित करणे.

- सांध्यामध्ये घर्षण कमी करणे.

- मेंदूचे पोषण करणे.

- रोज शरीरातून पाणी मल, मूत्र, घाम व श्वासाद्वारे शरीराबाहेर पडते. तेव्हा ही तूट भरून काढणे

———————-

गरजेपेक्षा कमी प्यायलो तर काय होईल?

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर सर्वात प्रथम मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. डिहायड्रेशन होते. आपण पाणी कमी प्यायलो तर लघवीचा रंग पिवळसर होतो. त्यामुळे अशी लघवी झाल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.

- शरीराची काम करण्याची शक्ती कमी होते.

- मानसिक शक्ती कमी होते अन् निरुत्साही वाटते.

- त्वचा कोरडी पडायला लागते, रक्तदाब कमी होतो.

————————————————

प्रत्येकाची पाणी पिण्याची गरज वेगळी असते. तहान लागली तरच पाणी प्यायले पाहिजे. एखाद्याला हृदयाचा त्रास असेल तर अधिक पाणी पिल्याने हृदयावर खूप ताण येईल. जर कोणाला लघवीला अडचण येत असेल आणि त्याने अधिक पाणी प्यायले तर ते तुंबून त्रास वाढेल. एखाद्याला मूतखडा नेहमी होत असेल तर त्याला अधिक पाणी प्यायला सांगितले जाते. पण, सरसकट सर्वांनी खूप पाणी पिऊ नये. भूक लागल्यावर पाणी पितो अगदी तसेच तहान लागली की पाणी प्यावे.

- डाॅ. शिरीष भावे, यूरोलाॅजिस्ट

—————————————————