शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जास्तीचे पाणी पिणेदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

डमी १२१० पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही ...

डमी १२१०

पुणे : दररोज सकाळी तांब्याभर पाणी पिले तर आरोग्याला छान असते. भरपूर पाणी पिण्याच्या नावाखाली तहान नाही लागली तरी पाणी पिले जाते. दररोज तीन लिटर पाणी पिलेच पाहिजे का? असे अनेक गैरसमज पसरलेले असून, त्यामुळे नेमके किती पाणी प्यावे याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. तहान लागली की पाणी प्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळी उठल्यावर अनेकजण पोट साफ व्हावे, म्हणून भरपूर पाणी पितात. खरंतर सकाळी आपोआप पोट साफ होणे हे जास्त योग्य असते. जे आदल्या दिवशी घेतलेला आहार, पाणी व व्यायाम या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जेव्हा सकाळी सकाळी आपण तांब्याभर पाणी पितो तेव्हा पाण्याच्या दबावाने आतड्यांची हालचाल सुरू होते व पोट साफ व्हायला मदत होते. पाणी गरम असेल तर पोट आणखी लवकर साफ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर अन्न पचनासाठी जास्त वेळ लागेल. अन्न पचनासाठी आवश्यक असलेला अग्नि हा मंद होईल. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नये. पोटाचे चार भाग करून आपणच दोन भाग अन्न, एक भाग पाणी व एक भाग हवेसाठी मोकळा ठेवावा तरच तुमचे अन्नपचन नीट होईल, असे आयुर्वेद तज्ज्ञ मनोज भांगडे यांनी सांगितले.

———————————————

पाण्याची शरीराला का असते गरज?

- शरीराचे तापमान नियंत्रित करणे.

- सांध्यामध्ये घर्षण कमी करणे.

- मेंदूचे पोषण करणे.

- रोज शरीरातून पाणी मल, मूत्र, घाम व श्वासाद्वारे शरीराबाहेर पडते. तेव्हा ही तूट भरून काढणे

———————-

गरजेपेक्षा कमी प्यायलो तर काय होईल?

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर सर्वात प्रथम मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. डिहायड्रेशन होते. आपण पाणी कमी प्यायलो तर लघवीचा रंग पिवळसर होतो. त्यामुळे अशी लघवी झाल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.

- शरीराची काम करण्याची शक्ती कमी होते.

- मानसिक शक्ती कमी होते अन् निरुत्साही वाटते.

- त्वचा कोरडी पडायला लागते, रक्तदाब कमी होतो.

————————————————

प्रत्येकाची पाणी पिण्याची गरज वेगळी असते. तहान लागली तरच पाणी प्यायले पाहिजे. एखाद्याला हृदयाचा त्रास असेल तर अधिक पाणी पिल्याने हृदयावर खूप ताण येईल. जर कोणाला लघवीला अडचण येत असेल आणि त्याने अधिक पाणी प्यायले तर ते तुंबून त्रास वाढेल. एखाद्याला मूतखडा नेहमी होत असेल तर त्याला अधिक पाणी प्यायला सांगितले जाते. पण, सरसकट सर्वांनी खूप पाणी पिऊ नये. भूक लागल्यावर पाणी पितो अगदी तसेच तहान लागली की पाणी प्यावे.

- डाॅ. शिरीष भावे, यूरोलाॅजिस्ट

—————————————————