शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद

By admin | Updated: September 19, 2015 04:42 IST

मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात

वाघोली / मांजरी : मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन बछडे अद्यापही सापडले नसून जेरबंद बिबट्या जुन्नर-माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आला आहे. वाहनांना आडवे जाणे, कुत्र्यांची शिकार करणे, पाळीव जनावरांच्या वासरांना लक्ष्य करण्याचे प्रकार बिबट्याकडून केले जात होते. शनिवारी (दि. १२) जयप्रकाश द्विवेदी या कामगारावरला रात्रीच्या वेळी बिबट्याच्या बछड्यांनी हल्ला करून जखमी केले होते.या प्रकारानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी काठ्या, हत्यारे जवळ बाळगूनच बाहेर पडावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारीवरून बाएफ कंपनीजवळ झुडपामध्ये एक पिंजरा आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आला होता; मात्र सावज नसल्यामुळे बिबट्या काही त्यामध्ये जेरंबद होत नव्हता. वन विभागाकडे पिंजऱ्यात सावज ठेवण्याची विनंतीदेखील केली होती; परंतु वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत सावज ठेवता येत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जात होती. तोपर्यंत नवनाथ आव्हाळे यांच्या गोठ्यातील ५ जनावरांचा फडशा बिबट्याकडून पाडला गेला होता. अखेर गुरुवारी वन विभागाच्या कार्यवाहीतील दिरंगाई पाहून माजी सरपंच नारायण आव्हाळे यांनी गावातील तरुणांच्या मदतीने नवनाथ आव्हाळे यांच्या घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतीच्या जवळ पिंजरा हलविला. तोपर्यंत वन विभागाच्या वतीने सावज ठेवण्याची परवानगी आली असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सायंकाळी बकरीचे सावज पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकून उस्मान सय्यद आणि अन्वर खान या ठिकाणी आले आणि बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसले. दोघांनी तत्काळ आव्हाळवाडीतील नागरिकांना कळविले. तरुणांनी पिंजऱ्याला लगेच कुलूप लावून पिंजऱ्याजवळ ठाण मांडले. वन विभागालाही कळविल्यानंतर वनाधिकारी संतोष ताकवले, आर. टी. मगर, व्ही. व्ही. निकम या ठिकाणी दाखल झाले. स्थानिक तरुण आणि वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास जुन्नर-माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आले़पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या ८ वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये बिबट्याची सर्व तपासणी करण्यात येत असून, पूर्णपणे सदृढ आढळल्यास वनक्षेत्रामध्ये सोडून देण्यात येईल. त्या परिसरामध्ये काही संशयित आढळल्यास पुन्हा पिंजरा लावण्यात येईल.- सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक पुणे