शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दौंडला मिळाले पाणी

By admin | Updated: May 6, 2016 05:45 IST

खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली

यवत : खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली. गुरुवार (दि. ५) दुपारच्या सुमारास तालुक्यात पाणी पोहोचले. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने दौंड शहर व तालुक्यातील गावठाणांतील नागरिक कालव्यातील पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पुण्यातील राजकीय विरोधानंतर हे पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले आहे. परंतु, पाणी कधी येणार, याची ग्रामस्थ वाट पाहत होते. राजकीय गदारोळ आणि विरोधानंतरदेखील पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड व इंदापूर या तालुक्यांसाठी १ टीएमसी पाणी कालव्याद्वारे देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. दौंड तालुक्याला पिण्यासाठी पाणी दिले जावे, अशी आग्रही मागणी करणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचे आभार मानले आहेत.गुरुवारी दुपारी कालव्यातील पाणी दौड तालुक्यात पोहोचले. मात्र, या पाण्यासमवेत पुणे शहरात कालव्यात टाकण्यात आलेला कचरादेखील प्रवाहाबरोबर वाहत येताना दिसत होता. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते. दौड तालुक्यात धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी धरणग्रस्तांना देऊन त्याग केला आहे. तर, धरणात जमिनी गेलेले शेतकरीदेखील आता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना, दौंडच्या हक्काचे पाणी पुण्यातील जनतेला पिण्यासाठी दिले जात आहे. आता शेतीसाठी नाही तर निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे, याकरिता दोन्ही तालुक्यांतील नागरिक मागणी करीत आहेत. एकीकडे मिरजमधील पाणी दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने दिले जाताना मिरजेच्या जनतेने सहकार्य केले, तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील जनता तिचे हक्काचे पाणी शेतीसाठी न मागता निदान पिण्यासाठी मिळावे, यासाठी मागणी करीत असताना पुण्यातील सुजाण व सुज्ञ नागरिक त्याला विरोध करतात, ही शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया दौड तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)१३ मेपर्यंत आवर्तनदि. १३ मेपर्यंत कालव्यातून दौंड व इंदापूर तालुक्यांसाठी पिण्याकरिता सोडण्यात आलेले आवर्तन सुरू ठेवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालुक्यातील दौंड शहर व गावोगावचे पिण्यासाठी असलेले तलाव व विहिरी या पाण्याने भरण्यात येणार असल्याने काहीसा दिलासा येथील ग्रामस्थांना मिळाला आहे.पाण्यासोबत कचराकालव्याची सफाई न झाल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात कचरा आला. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते.