शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

पावसाळ्याच्या तोंडावर नाले तुंबलेले

By admin | Updated: May 15, 2016 00:36 IST

नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले.

पिंपरी : नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. नाल्यात पडलेला राडारोडा, पोती, कागद, प्लॅस्टिक यांमुळे काही भागांतील नाले तुंबले आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाईल का नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. नेहरुनगर परिसरात तर नाल्यावरच अनेक टपऱ्या उभारल्या आहेत. याच ठिकाणी भंगाराचे दुकान आहे.आजूबाजूचे भंगार गोळा करणारे लोक या दुकानात माल आणून देतात. दुकानदाराकडून न लागणारा माल या नाल्यात टाकला जातो, असे येथील नागरिकांनी सांगितले. भोसरी रस्त्यावरील ‘इ’ ब्लॉकमधील एका नाल्याच्या आजूबाजूला सर्व कंपन्या आहेत. या कंपन्यांचे सांडपाणी व रसायणमिश्रित पाणी नाल्यात सोडले जाते. अनेक वर्षांपासून हा नाला साफच केला नसल्याचे लोक सांगतात. नाल्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे नाल्यातील पाणी पुढे जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये विषारी सापांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. लांडेवाडी चौकातील झोपडपट्टीलगत असलेल्या नाल्यातील कचरा काढला जात नसल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे. (प्रतिनिधी)नाल्यात कंपनीचे सांडपाणीनिगडी-भोसरी टेल्को रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेला नाला टाकलेला राडारोडा यामुळे दिसेनासा झाला आहे. गवत व झाडे वाढल्यामुळे नालाच दिसत नाही. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबून रस्त्यावरून वाहते व वाहतूककोंडी निर्माण होते. अपघातही घडतात, असे आजूबाजूच्या व्यावसायिकांनी सांगितले. हाच नाला पुढे एमआयडीसीतून वाहतो. त्या ठिकाणी नाल्यात कंपनीचे सांडपाणी सोडले जाते.उद्यानातही दुर्गंधीचा त्रासचिंचवड परिसरातील एक उद्यान नाल्याच्या बाजूला उभारले आहे. नाल्यातील अस्वच्छतेमुळे उद्यानातही दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होऊ लागली आहे. पिंपरी परिसरात टेम्पो चौक व लिंक रस्ता या ठिकाणचे नाले थेट नदीत सोडले जातात. यामुळे पवना नदी दूषित झाली आहे. संजय गांधीनगरमध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे नदी व नाल्यातील पाणी कमी झाले आहे. या वर्षी नदी व नाल्यातील गाळ काढून नदीचे पात्र रुंद केले व स्वच्छता केली, तर पावसाळ्यात पाणी साठवून त्याचा वर्षभर वापर करता येईल, अशा सूचनाही काही नागरिकांनी केल्या आहेत.ठेकेदारांची दिरंगाईदर वर्षी महापालिकेकडून नालेसफाईचा ठेका दिला जातो. मात्र, ठेकेदारांकडून कधीच वेळेत काम होत नाही. पाऊस सुरू झाल्यावर नाले आपोआप पावसाच्या पाण्याने साफ होतात. धुऊन निघतात. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जाते. महापालिकेकडून नालेसफाई करण्याचे पैसे घेतले जातात. मात्र, पावसाने नाले साफ झाल्यावर ठेकेदारांचे काम निम्म्यापेक्षा सोपे होते. आता नालेसफाई केली जाईल का नाही, याबाबत शंका असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.