शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आदिवासी साहित्यासाठीचा डॉ. गोविंद गारे पुरस्कार पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST

------------ डिंभे : आदिवासी साहित्याची निर्मिती ही प्रारंभिक कालखंडात मौखिक साहित्यातून झाली व अलीकडील दशकात लिखित स्वरूपात आदिवासी ...

------------

डिंभे : आदिवासी साहित्याची निर्मिती ही प्रारंभिक कालखंडात मौखिक साहित्यातून झाली व अलीकडील दशकात लिखित स्वरूपात आदिवासी साहित्य व्यक्त होऊ लागले. मात्र या साहित्यासाठी डॉ. गोविंद गारे या नावाने दिला जाणारा पुरस्कार शासनाने बंद केला असून आदिवासी साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या २३ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार स्व. यशवंतराव चव्हाण, राज्य वाङमय पुरस्कार योजनेअंतर्गत उत्कृष्ट आदिवासी साहित्याला डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु ७ डिसेंबर २०१९ च्या भाषा विभागाच्या शासन निर्णयाने हा पुरस्कार देण्याचे थांबविण्यात आले आहे. राज्यभर अनेक आदिवासी साहित्य संमेलने होऊन, आदिवासी साहित्याचा ठसा मराठी भाषेत उमटला जाऊ लागला आहे. आदिवासींच्या ४५ जमाती व ७४ बोली भाषांची वेगळी ओळख आहे. मात्र आदिवासी साहित्य, शासन स्तरावर उपेक्षितच राहिले आहे. साहित्य वर्तुळात आदिवासी साहित्याची फारशी दखल घेतली गेली नाही. जसजशी आदिवासी समाजात अक्षरओळख झाली, तसतसे आदिवासी समाजातील साहित्यिक लिहिते झाले आहेत.

मात्र महाराष्ट्र शासनाने आदिवासी साहित्याचा समावेश उपेक्षितांचे साहित्यात केलेला आहे आदिवासी साहित्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य न करता त्याचा समावेश इतरत्र करणे हा आदिवासी साहित्यावर अन्याय झाल्याची भावना साहित्यिकांमध्ये होऊ लागली आहे. आदिवासी साहित्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार रद्द करून त्याचा समावेश इतर घटकात केल्याने आदिवासी साहित्याची स्वतंत्र ओळख संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

आदिवासी साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आदिवासी साहित्याचा पुरस्कार डॉ.गोविंद गारे यांच्या नावाने पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाकडे आदीम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र या संस्थेचे पदाधिकारी किरण लोहकरे, डॉ. हनुमंत भवारी व डॉ.अमोल वाघमारे यांनी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.