शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले ‘राजगड’चा सहा महिन्यांत डीपीआर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार (भाग २) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजगड ...

डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार

(भाग २)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राजगड किल्ल्यावर ‘रोप-वे’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्या बाजूने ‘रोप-वे’ करता येऊ शकतो याचा तांत्रिक, भौगोलिक आर्थिकदृष्ट्या सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून येत्या सहा महिन्यांत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करून शासनाला सादर करणार आहे. तर त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वातून ‘रोप-वे’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गड, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिर तसेच विविध नैसर्गिक ठिकाणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. ‘रोप-वे’ झाल्यास राजगडावर अनेक सुविधा या अनुषंगाने विकसित होणार आहेत.

------

गडावर हॉटेल होणार नाही

‘रोप-वे’ने येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेऊन गडावर फक्त पाणी, चहा आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गडावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल अथवा इतर सुविधा मिळणार नाही. संपूर्ण गड पाहण्यास कमीत कमी चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे चहा, पाणी आणि स्वच्छतागृह या तीनच गोष्टी पुरवण्यात येणार आहे.

------

गडाच्या पायथ्याला हॉटेल अन् निवासाची सोय

‘रोप-वे’च्या निर्मितीमुळे किल्ले राजगडकडे अनेकांचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हॉटेल, कॅफेटेरिया, निवास व्यवस्था, पार्किंग आणि इतर सुविधा या गडाच्या पायथ्याला करण्यात येणार आहे. गडावर यांपैकी काहीही करण्यात येणार नसल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

------

गडावरील कोणत्याही वास्तूला बाधा होणार नाही

‘रोप-वे’ लँडिंगसाठी जास्तीत जास्त एक गुंठ्याची जागा लागते. एक कॅन्टीन आणि स्वच्छतागृह होईल. यासाठी तशी जागा निवडण्यात येणार आहे. त्यामुळे गडावरील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला बाधा होणार नाही. त्याची पुरेपूर काळजी पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.

------

कोट

राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुमारे २५ वर्षे राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी रोप-वेच्या विकासामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होईल.

- डॉ. धनंजय सावळकर, पर्यटन संचालक