शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले ‘राजगड’चा सहा महिन्यांत डीपीआर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार (भाग २) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजगड ...

डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार

(भाग २)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राजगड किल्ल्यावर ‘रोप-वे’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्या बाजूने ‘रोप-वे’ करता येऊ शकतो याचा तांत्रिक, भौगोलिक आर्थिकदृष्ट्या सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून येत्या सहा महिन्यांत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करून शासनाला सादर करणार आहे. तर त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वातून ‘रोप-वे’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गड, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिर तसेच विविध नैसर्गिक ठिकाणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. ‘रोप-वे’ झाल्यास राजगडावर अनेक सुविधा या अनुषंगाने विकसित होणार आहेत.

------

गडावर हॉटेल होणार नाही

‘रोप-वे’ने येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेऊन गडावर फक्त पाणी, चहा आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गडावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल अथवा इतर सुविधा मिळणार नाही. संपूर्ण गड पाहण्यास कमीत कमी चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे चहा, पाणी आणि स्वच्छतागृह या तीनच गोष्टी पुरवण्यात येणार आहे.

------

गडाच्या पायथ्याला हॉटेल अन् निवासाची सोय

‘रोप-वे’च्या निर्मितीमुळे किल्ले राजगडकडे अनेकांचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हॉटेल, कॅफेटेरिया, निवास व्यवस्था, पार्किंग आणि इतर सुविधा या गडाच्या पायथ्याला करण्यात येणार आहे. गडावर यांपैकी काहीही करण्यात येणार नसल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

------

गडावरील कोणत्याही वास्तूला बाधा होणार नाही

‘रोप-वे’ लँडिंगसाठी जास्तीत जास्त एक गुंठ्याची जागा लागते. एक कॅन्टीन आणि स्वच्छतागृह होईल. यासाठी तशी जागा निवडण्यात येणार आहे. त्यामुळे गडावरील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला बाधा होणार नाही. त्याची पुरेपूर काळजी पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.

------

कोट

राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुमारे २५ वर्षे राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी रोप-वेच्या विकासामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होईल.

- डॉ. धनंजय सावळकर, पर्यटन संचालक