शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

महाआघाडी सरकारच्या १० टक्के आरक्षणाबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:10 IST

पुणे : “राज्यातील महाआघाडी सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शासकीय नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशात दहा टक्के आरक्षण जाहीर ...

पुणे : “राज्यातील महाआघाडी सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शासकीय नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशात दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. मात्र, हेसुद्धा भविष्यात कितपत टिकेल याबद्दल शंका आहे. कारण, हे आरक्षणसुद्धा ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून हे आरक्षण देखील रद्द होऊ शकते,” असे मत राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

मराठा समाजास सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी (एसईबीसी) राज्य सरकारने दिलेले आरक्षण रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील वाढता असंतोष शांत करण्यासाठी राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय सरळसेवा नोकर भरतीत दहा टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र, महाआघाडी सरकारच्या या १० टक्के आरक्षणाबद्दलही साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रा. बापट म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी १०३ वी घटनादुरुस्ती केली त्यात आर्थिक मागासांना १० टक्के आर्थिक आरक्षण दिले आहे. ते देखील पन्नास टक्क्यांवर जात आहे. दोन दिवसांत घाईघाईने ही घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यावर सखोल विचार झालेला नाही. त्यामुळे त्याला आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवू शकते. १०३ व्या घटना दुरुस्तीप्रमाणेच सीए कायदा आणि ३७० कलम हे घटनाबाह्य आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे खटलेच सध्या घेत नाहीये. हे खटले जेव्हा सर्वोच्च न्यायालय हाती घेईल तेव्हा सरकारला सर्वच गोष्टींना तोंड द्यावे लागेल. तोपर्यंत या दहा टक्के आरक्षणाचा लाभ दुर्बल घटकांना मिळू शकेल.”

चौकट

...तर ओबीसी-मराठा संघर्ष

मात्र, घटनेच्या ४६ व्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्त्वाअंतर्गत शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या तरतुदी करण्याचा सरकारला अधिकार आहे. त्यात हे आरक्षण कदाचित बसवता येऊ शकेल, असे प्रा. बापट म्हणाले. मात्र, हे आरक्षण संपूर्ण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने त्यातील ३ ते ४ टक्केच मराठा समाजाच्या वाट्याला येऊ शकते. परंतु त्यासाठीही मराठा मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाने मराठा मागास आहेत हेच नाकारले आहे. याकरिता त्यांना ‘ओबीसी’मध्ये बसवावे लागेल. तसे झाल्यास ओबीसी आणि मराठा संघर्ष सुरू होईल असे प्रा. बापट यांनी स्पष्ट केले.