शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी सुटल्यास ‘दोषारोपसिद्धी कसुरी’

By admin | Updated: May 8, 2015 05:30 IST

राज्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांमध्ये संनियंत्रण समिती

पुणे : राज्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांमध्ये संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे आदेश गृह विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत. यापुढे दोषारोपसिद्धीचे प्रमाण कमी आढळून आल्यास त्याला संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व आयुक्तालयामध्ये परिमंडलीय उपायुक्तांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये ‘दोषारोपसिद्धी कसुरी’ची नोंदही करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासाअंती न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात येते. दोषारोपपत्रातील पुरावे कायद्याच्या कसोटीवर न उतरल्याने अनेक आरोपी निर्दोष सुटतात. आरोपीचा बचाव करण्याचा आरोप आणि टीका होऊ नये म्हणूनही सबळ पुरावा नसतानाही पोलीस दोषारोपपत्र दाखल करतात. कधी कधी तपास अपूर्ण असतानाही दोषारोपपत्र दाखल केले जाते. या सगळ्या कारणांमुळे दोषारोप सिद्धीचे प्रमाण कमी होत चालले आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच दोषारोपपत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमार्फत पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. या समितीमध्ये न्याय दंडाधिकारी न्यायालयाकरिता पोलीस अपुरावेधीक्षक अथवा उपायुक्त यांचा प्रतिनिधी, सहायक संचालक आणि तपासी अधिकाऱ्याची समिती काम करणार आहे. तर, सत्र न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक अथवा उपायुक्त यांचा प्रतिनिधी, जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि तपासी अधिकारी यांची समिती असणार आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेल्या प्रकरणांपैकी किमान ५० टक्के अथवा अधिक प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध होईल, याकडे लक्ष देण्याबरोबरच दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन दोषारोपपत्र न गेलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. आरोप सिद्ध होऊ शकतील, असे सबळ पुरावे असलेल्या गुन्ह्यांची यादी करुन ती न्यायालयात दाखल करण्यापूर्वी संनियंत्रण समितीमार्फत तपासून घेण्यात येणार आहे. तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आधारे शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यावर भर देऊन जिल्हास्तरीय छाननी समितीसमोर पाठविण्यात यावेत. जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीअंती न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांचा मासिक आढावा अधीक्षक अथवा उपायुक्तांनी घ्यावा. जिल्हा, परिमंडळनिहाय दोषारोपसिध्दीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ग्रामीणसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, तर आयुक्तालयासाठी पोलीस आयुक्तांनी आढावा घेण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.