शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी सुटल्यास ‘दोषारोपसिद्धी कसुरी’

By admin | Updated: May 8, 2015 05:30 IST

राज्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांमध्ये संनियंत्रण समिती

पुणे : राज्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांमध्ये संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे आदेश गृह विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत. यापुढे दोषारोपसिद्धीचे प्रमाण कमी आढळून आल्यास त्याला संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व आयुक्तालयामध्ये परिमंडलीय उपायुक्तांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये ‘दोषारोपसिद्धी कसुरी’ची नोंदही करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासाअंती न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात येते. दोषारोपपत्रातील पुरावे कायद्याच्या कसोटीवर न उतरल्याने अनेक आरोपी निर्दोष सुटतात. आरोपीचा बचाव करण्याचा आरोप आणि टीका होऊ नये म्हणूनही सबळ पुरावा नसतानाही पोलीस दोषारोपपत्र दाखल करतात. कधी कधी तपास अपूर्ण असतानाही दोषारोपपत्र दाखल केले जाते. या सगळ्या कारणांमुळे दोषारोप सिद्धीचे प्रमाण कमी होत चालले आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच दोषारोपपत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी मध्यवर्ती संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमार्फत पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. या समितीमध्ये न्याय दंडाधिकारी न्यायालयाकरिता पोलीस अपुरावेधीक्षक अथवा उपायुक्त यांचा प्रतिनिधी, सहायक संचालक आणि तपासी अधिकाऱ्याची समिती काम करणार आहे. तर, सत्र न्यायालयाकरिता पोलीस अधीक्षक अथवा उपायुक्त यांचा प्रतिनिधी, जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि तपासी अधिकारी यांची समिती असणार आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेल्या प्रकरणांपैकी किमान ५० टक्के अथवा अधिक प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध होईल, याकडे लक्ष देण्याबरोबरच दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन दोषारोपपत्र न गेलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. आरोप सिद्ध होऊ शकतील, असे सबळ पुरावे असलेल्या गुन्ह्यांची यादी करुन ती न्यायालयात दाखल करण्यापूर्वी संनियंत्रण समितीमार्फत तपासून घेण्यात येणार आहे. तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आधारे शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यावर भर देऊन जिल्हास्तरीय छाननी समितीसमोर पाठविण्यात यावेत. जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीअंती न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांचा मासिक आढावा अधीक्षक अथवा उपायुक्तांनी घ्यावा. जिल्हा, परिमंडळनिहाय दोषारोपसिध्दीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ग्रामीणसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, तर आयुक्तालयासाठी पोलीस आयुक्तांनी आढावा घेण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.