शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आजारांना हवा सकारात्मकतेचा डोस

By admin | Updated: May 12, 2017 05:21 IST

कर्क रोगासारख्या दुर्धर आजारांबरोबर जीवनातील इतर समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्क रोगासारख्या दुर्धर आजारांबरोबर जीवनातील इतर समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकते. जगभरात हे नवे तंत्र विकसित होत असून, त्याद्वारे अनेक दुर्धर आजारांना रोखणे शक्य झाले आहे. त्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मक राहा, असा जीवनदायी सल्ला आरोग्यतज्ज्ञ डॉ. गुरुराज मुतालिक यांनी गुरुवारी येथे दिला. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ‘आरोग्य आणि मन:शांती’ या विषयावर ते बोलत होते. प्रभात रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. अस्थिरोगतज्ज्ञ के. एच. संचेती, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, बहारी मल्होत्रा, जनसेवाचे डॉ. विनोद शहा, पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा या वेळी उपस्थित होते. मुतालिक म्हणाले, ‘‘मन:स्वास्थ्य आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम जगभर अभ्यासला जात आहे. हे नवीन तंत्र वेगाने विकसित होत आहे. भारताने पूर्वीपासूनच आयुर्वेद आणि योग यांद्वारे या शास्त्रावरच भर दिला आहे. आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर औषधांचा परिणाम अधिक जलद आणि परिणामकारक होतो. नकारात्मकता ही नेहमीच विविध आजारांना आमंत्रण देणारी असते. एखाद्या आजारापुढे रुग्णानेच डोके टेकल्यास, औषधे परिणाम करीत नाहीत. मन:शांती आणि योगाचा उपयोग करून आपले आयुष्य आनंदी ठेवले पाहिजे.’’मन:शांतीद्वारे बायपाससारख्या शस्त्रक्रियेनंतरही ३० वर्षांहून अधिक काळ स्वस्थ जीवन जगत असल्याचा अनुभव एका व्यक्तीने सांगितला. रुग्णांचे मनोबल वाढविल्यास औषधे देखील लवकर परिणाम करतात, असा अनुभव एका डॉक्टरांनी सांगितला.