शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आजारांना हवा सकारात्मकतेचा डोस

By admin | Updated: May 12, 2017 05:21 IST

कर्क रोगासारख्या दुर्धर आजारांबरोबर जीवनातील इतर समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्क रोगासारख्या दुर्धर आजारांबरोबर जीवनातील इतर समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकते. जगभरात हे नवे तंत्र विकसित होत असून, त्याद्वारे अनेक दुर्धर आजारांना रोखणे शक्य झाले आहे. त्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मक राहा, असा जीवनदायी सल्ला आरोग्यतज्ज्ञ डॉ. गुरुराज मुतालिक यांनी गुरुवारी येथे दिला. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ‘आरोग्य आणि मन:शांती’ या विषयावर ते बोलत होते. प्रभात रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. अस्थिरोगतज्ज्ञ के. एच. संचेती, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, बहारी मल्होत्रा, जनसेवाचे डॉ. विनोद शहा, पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा या वेळी उपस्थित होते. मुतालिक म्हणाले, ‘‘मन:स्वास्थ्य आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम जगभर अभ्यासला जात आहे. हे नवीन तंत्र वेगाने विकसित होत आहे. भारताने पूर्वीपासूनच आयुर्वेद आणि योग यांद्वारे या शास्त्रावरच भर दिला आहे. आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर औषधांचा परिणाम अधिक जलद आणि परिणामकारक होतो. नकारात्मकता ही नेहमीच विविध आजारांना आमंत्रण देणारी असते. एखाद्या आजारापुढे रुग्णानेच डोके टेकल्यास, औषधे परिणाम करीत नाहीत. मन:शांती आणि योगाचा उपयोग करून आपले आयुष्य आनंदी ठेवले पाहिजे.’’मन:शांतीद्वारे बायपाससारख्या शस्त्रक्रियेनंतरही ३० वर्षांहून अधिक काळ स्वस्थ जीवन जगत असल्याचा अनुभव एका व्यक्तीने सांगितला. रुग्णांचे मनोबल वाढविल्यास औषधे देखील लवकर परिणाम करतात, असा अनुभव एका डॉक्टरांनी सांगितला.