शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा अतीवापर नको पण उपवासही नकोच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

चिमुरड्यांपासून तर थोरांपर्यंत आजकाल सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतोच. सकाळच उजाडते ती मोबाइलमध्ये सेट केलेल्या आवडीच्या आलार्म गाण्याच्या गजराने..आणि लॉकडाऊनच्या ...

चिमुरड्यांपासून तर थोरांपर्यंत आजकाल सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतोच. सकाळच उजाडते ती मोबाइलमध्ये सेट केलेल्या आवडीच्या आलार्म गाण्याच्या गजराने..आणि लॉकडाऊनच्या काळातही मित्रांना गप्पाटप्पा मारता आल्या त्या मोबाईलमधील विविध ॲप्स व व्हिडीओ कॉलींमुळे. अगदी लहान मुलाला घास भरवतांना देखील पूर्वी आई गोष्ट सांगायची.. गाणी म्हणायची परंतु आजकाल चक्क आजीसुद्धा मोबाइलवर गाणी किंवा कार्टून लावून चिमुरड्यांना घास भरवतात. हल्ली चिऊ काऊ हे झाडावर न दिसता मोबाइलमध्येच दिसतात. आणि बघा ना हे चिमुरडेही मोबाइलवर गाणी लागताच किती पटकन घास घेतात,किती नवल ना...

तरुण मंडळी तर काय मोबाईल ही जणूकाही संजीवानीच मानतात. थोडावेळ मोबाईल बंद झाला किंवा चार्जिंग संपलं तर त्यांचा जीव नुसता कासावीस होतो. तो पूर्ववत सुरु झाला कि त्यांच्या जीवात जीव येतो .. खरंय ना..अहो एवढंच काय या शाळांचंच बघा ना!!हल्ली या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे पूर्वी ज्या शिक्षिका विद्यार्थ्यांना मोबाईल बाहेर ठेऊन किंवा बंद करून यायला सांगायच्या त्याच आता मोबाईल बंद केला तर ऑनलाईन तासाला वर्गात घेत नाहीत.

अहो एवढंच काय तर हल्लीच्या आज्या देखील देवघरात संध्याकाळी दिवा लावल्यावर शुभंकरोतती व श्लोक देखील मोबाइलवरच निवांत ऐकतात.

शाळेतील व कॉलेज मधील विद्यार्थी अभ्यास करायलादेखील पुस्तक हातात न घेता मोबाइलवर चक्क धडे ऐकतात. एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर डिकशनरीच्या ऐवजी मोबाईल गुगल वरच अर्थही शोधतात... खरंच मोबाइलमुळे हल्लीची पिढी स्मार्ट जरी झाली असेल तरी शेवटी काय तर स्वामी तिन्ही जगाचा मोबाइलविना भिकारी असे म्हणायची वेळ येऊ नये यासाठी मोबाइलचा अतिरिक्त वापर टाळणे महत्वाचे!!

मोबाइलमुळे सर्व घरबसल्या ऑर्डर देऊन बोलावता येते, परदेशातील लोकांचा सहज संपर्क साधता येतो असे बरेच मोबाइलचे फायदे देखील आहेतच, परंतु कुठलीही गोष्ट मापात असेल तरच ती फायद्याची असते. मोबाइलचा वापर महत्वाच्या ठिकाणी केला तर मोबाईल निश्चितीच एक वरदान आहे, पण त्याचप्रमाणे मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे निश्चितच माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यवर परिणाम होऊ शकतो. परंतु मोबाइलचा वापर अगदी गरजूपुरताच केला तर खरच मोबाईल हा एक उत्तम संपर्काचे व माहितीचे उत्तम साधन आहे. विचार करा तर मित्रांनो मोबाईल हे एक साधन म्हणून वापरायचे की एक व्यसन म्हणून.

निर्मल पंडित

मुख्याध्यापिका -पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल.. सुस ब्रांच*