शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आमचं माळीण होऊन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील पाच गावे अति धोकादायक गावे म्हणून घोषित आहेत. त्यामध्ये भीमाशंकर ...

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील पाच गावे अति धोकादायक गावे म्हणून घोषित आहेत. त्यामध्ये भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी हे गाव आहे. कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत हे गाव वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य अशा डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी संपूर्ण गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावाच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. यामुळे डोंगर कोसळण्याच्या दहशतीत काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ७० ते ८० घर असणारे हे गाव आहे. पाच सहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहेत. तर या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतींना ओल येऊन काही घरे कोसळायचे ही प्रकार घडले आहेत. शासन दरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव प्रलंबित आहे. माळीनसारखी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडला आहे.

कोट

बा आम्ही वरच्या दगडाक पाहतोय अन् दगड आमच्याक पाहतोय. कधी आमच्यावर हे दगड घाला घालतील हे सांगता येत नाही. रातरात डोळ्याला डोळा न्हाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुली मधुन पाण्याच उभड निघालत माळीन सारखा कव्हा घाला होईल सांगता येत न्हाय. सरकारी अधिकारी येतात; अन् म्हणतात तुम्ही सांजच्या पहारी वरती माचिचावाडीला झोपायला जा. अन सकाळ झाली का परत तुमच्या घरी परत जा. कित्येक वर्षी झाली आम्हा आशेला लावून सांगतात तुमच पुनर्वसन करू. मायबापांनो आमचं माळीन होऊन देऊ नका.

चिमा पारधी, दुंदा भोकटे, काळवाडी येथील ग्रामस्थ

चौकट

या काळवाडीच्या पुनवर्सनाचा विषय कित्येक दिवस शासन दरबारी पडुन आहे. पावसाळा सुरु झाला की प्रशासन व अधिकाऱ्यांना जाग येते. शासनाने तात्काळ या गावांचे पुर्नवसन करावे. या गावावरील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. घरांना मोठ्या प्रमाणात ओलावा येवुन घरांमध्ये पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. एखादी घटना घडण्यापुर्वी सरकारणे या बाबतची काळजी घ्यावी.

- विठ्ठल पारधी

सामाजिक कार्यकर्ते काळवाडी

फोटो ई मेल करत आहे.

फोटो खालचा मजकुर:-:-आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशं

कर खोऱ्यामध्ये मृत्युच्या छायेत वसलेले काळवाडी हे गाव.

(छायाचिञ संतोष जाधव)

तळेघर वार्ताहार संतोष जाधव