शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अकरा गावांसारखी वागणूक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:17 IST

अकरा गावांसारखी वागणूक नको कोंढवे धावडे वासियांची भावना दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेत चार ...

अकरा गावांसारखी वागणूक नको कोंढवे धावडे वासियांची भावना

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिकेत चार वर्षापुर्वी ज्या अकरा गावांचा समावेश झाला त्या गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही, पायाभूत सुविधांची अजूनही वानवा आहे. आमच्यावर तशी परिस्थिती येऊ नये, अशी भूमिका कोंढवे-धावडेकरांनी मांडली.

आमच्या गावात राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आहे. याचा फायदा गावातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये व्हायला हवा पण तसे होत नसल्याने गावातील तरूण बेरोजगार झाले आहेत. आमच्या पिढीला खेळण्यासाठी जागा असायची पण आताच्या पिढीला खेळण्यासाठी क्रिडांगण नाही हा त्यांच्यावर अन्याय असल्याची तक्रार गावातील जेष्ठ नागरिकांनी केली.

कोंढवे-धावडेतील मांसविक्रेते संध्याकाळी त्यांचा दिवसभरातील साठलेला कचरा उघड्या जागेवर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी तर पसरतेच पण यातून मोकाट कुत्र्यांची मोठी संख्या वाढली असून त्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. मागील काही दिवसांत ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांवर कुत्र्यांचे जिवघेणे हल्ले झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. महानगरपालिकेने कुत्र्यांना आळा घालणारी मोहीम तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

गावातील विद्यार्थ्यांना पुणे शहरात न जावे लागता गावाजवळच महाविद्यालयाची सोय व्हावी. गावात जलतरण तलाव नसल्याने त्यासाठी तरतूद करावी. शहर बस वाहतुकीसाठी बसस्थानक नसल्याने पीएमपी बसगाड्या रस्त्यावर कुठेही उभ्या केल्या जातात त्यामुळे अपघातांची शक्यता असते. प्रशासनाने बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आमच्या गावाचा पुणे महापालिकेत १९९७ साली समावेश झाला होता पण २००१ ला पुन्हा गावाला वगळण्यात आले. आता समावेश होणार असेल तर गावात विकासाभिमुख प्रकल्प राबवले जावेत, अशा गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.

कोट

विलिनीकरणानंतर आमची पाणीपट्टी कमी होईल मात्र घरपट्टी वाढेल. त्यामुळे महापालिकेने सुवर्णमध्य साधत दिलासा द्यावा.

- संदीप खराडे, नोकरदार

कोट

महापालिकेने गावाच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करून द्यावा. -राजू राठोड, उपसरपंच.

फोटो ओळ - मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून त्या कामाचे दगड आणि लोखंडी गज तसेच रस्त्याच्या कडेला टाकून दिलेले आहे. याने वाहतुकीचा खोळंबा तसेच अपघाताची शक्यता वाढते.