शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मनाचे शरीरावर अधिराज्य - दृष्टिकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ...

विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ‘कमकुवत’ झाल्याने भारतीय युद्धात त्याच योद्ध्यांसमोर त्याला त्याचे धनुष्यदेखील पेलवले नव्हते. त्यावेळी तर सर्व सैन्य, पांडव व स्वत: भगवान श्रीकृष्ण त्याच्याबरोबर होते, तरीही!!!

आपण जो विचार करतो त्याप्रमाणे आपल्या मनातील विश्वास, पॅटर्नस् तयार होत असतात. मनातील ठाम विश्वासाला अनुसरून आपला दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा कल बनतो. दृष्टिकोन भावनेला जन्म देतो. भावनेतून मनातल्या मनातील आणि प्रत्यक्ष वाणीतले, बोलण्यातले शब्द तयार होतात. शब्दांनंतर प्रत्यक्ष कृती होते आणि सरतेशेवटी जशी आपली कृती असेल त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होते, परिणाम प्राप्त होतात, रिझल्ट्स मिळतात.

आपला विचार, दृष्टिकोन सकारात्मक असेल, उच्च असेल, चांगला असेल तर कोणत्याही घटनेचा अथवा परिस्थितीचा नकारात्मक, वाईट परिणाम आपल्यावर होत नाही. जगात कोणतीही घटना किंवा परिस्थिती इतकी वाईट नसते की त्यापासून आपल्याला फायदा करून घेता येत नाही. त्यात काहीतरी चांगले असतेच.

चांगल्या, सकारात्मक दृष्टिकोनाचा, विचाराचा एक फायदा तर नक्कीच होतो की कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीत आपले मन स्थिर व शांत राहू शकते. पुढील शारीरिक, मानसिक नुकसान टाळता येते.

आपल्याला इलेक्ट्रिक बल्बची देणगी देणाऱ्या सर थॉमस अल्वा एडिसन यांच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीला एकदा प्रचंड आग लागली. त्यांचे जवळपास नऊ हजार संशोधनाचे कागद आगीत जळून खाक झाले. कोणीतरी त्यांना खबर दिली. ते आपल्या मुलाला घेऊन गेले. त्यांनी सर्व पाहिले. मुलाला सांगितले की, ‘जा, तुझ्या आईला घेऊन ये.’

एडिसन यांच्या पत्नीने ते दृश्य पाहिले व तिला चक्कर यायला लागली. एडिसनने तिचा हात धरला, शांत केले व आकाशाकडे दोन्ही हात उंचावत म्हणाले, ‘‘हे देवा तुझे आभार, माझ्या सर्व चुका जळून गेल्या.’’ केव्हढी स्थिरता! केव्हढा देवावर विश्वास! आणि आपण? खिशातून दहा रुपयांची नोट पडली तर पडली म्हणून अर्धा दिवस दु:खात काढतो. दृष्टिकोन, विचार महत्त्वाचा!

डॉ. बाख यांच्या मते कोणताही रोग, आजार हा दुष्ट किंवा क्रूर नसून नियतीने आपल्याला दिलेला एक संकेतच असतो. आपल्याकडून कोठेतरी, काहीतरी चूक नक्कीच झाली आहे किंवा होत आहे. विचारांची दिशा चुकल्याचे ते द्योतक आहे तसेच आपण पुढे आणखी मोठी चूक करू नये असेही जणू नियती आपणास सांगत असते. वेळीच सुधारा व पुढील धोका टाळा.

प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस दडलेला असतो. त्याचे चांगले गुण म्हणजे एकाग्रता, शहाणपण, मानवता, चांगले हेतू, धैर्य स्थैर्य इ. होत. जर हे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वातून, आचरणातून प्रकट झाले नाहीत तर त्या विरोधी भावना, गुण दिसून येतात. उदा. क्रोध, लोभ, मोह, तिरस्कार, द्वेष, हाव, हेवा, क्रूरता, स्वार्थ, दुर्लक्ष, निष्काळजीपणा इत्यादी. बारकाईने पाहिल्यास या व इतर विरोधी भावनाच सर्व आजारांस कारणीभूत असतात असे दिसते.

(क्रमश:)