शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

मनाचे शरीरावर अधिराज्य - दृष्टिकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ...

विराट युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण, अन्य पांडव व सैन्य बरोबर नसतानाही एकट्याने त्याने ज्या योद्ध्यांना नमविले तेच त्याचे मन ‘कमकुवत’ झाल्याने भारतीय युद्धात त्याच योद्ध्यांसमोर त्याला त्याचे धनुष्यदेखील पेलवले नव्हते. त्यावेळी तर सर्व सैन्य, पांडव व स्वत: भगवान श्रीकृष्ण त्याच्याबरोबर होते, तरीही!!!

आपण जो विचार करतो त्याप्रमाणे आपल्या मनातील विश्वास, पॅटर्नस् तयार होत असतात. मनातील ठाम विश्वासाला अनुसरून आपला दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा कल बनतो. दृष्टिकोन भावनेला जन्म देतो. भावनेतून मनातल्या मनातील आणि प्रत्यक्ष वाणीतले, बोलण्यातले शब्द तयार होतात. शब्दांनंतर प्रत्यक्ष कृती होते आणि सरतेशेवटी जशी आपली कृती असेल त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होते, परिणाम प्राप्त होतात, रिझल्ट्स मिळतात.

आपला विचार, दृष्टिकोन सकारात्मक असेल, उच्च असेल, चांगला असेल तर कोणत्याही घटनेचा अथवा परिस्थितीचा नकारात्मक, वाईट परिणाम आपल्यावर होत नाही. जगात कोणतीही घटना किंवा परिस्थिती इतकी वाईट नसते की त्यापासून आपल्याला फायदा करून घेता येत नाही. त्यात काहीतरी चांगले असतेच.

चांगल्या, सकारात्मक दृष्टिकोनाचा, विचाराचा एक फायदा तर नक्कीच होतो की कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीत आपले मन स्थिर व शांत राहू शकते. पुढील शारीरिक, मानसिक नुकसान टाळता येते.

आपल्याला इलेक्ट्रिक बल्बची देणगी देणाऱ्या सर थॉमस अल्वा एडिसन यांच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीला एकदा प्रचंड आग लागली. त्यांचे जवळपास नऊ हजार संशोधनाचे कागद आगीत जळून खाक झाले. कोणीतरी त्यांना खबर दिली. ते आपल्या मुलाला घेऊन गेले. त्यांनी सर्व पाहिले. मुलाला सांगितले की, ‘जा, तुझ्या आईला घेऊन ये.’

एडिसन यांच्या पत्नीने ते दृश्य पाहिले व तिला चक्कर यायला लागली. एडिसनने तिचा हात धरला, शांत केले व आकाशाकडे दोन्ही हात उंचावत म्हणाले, ‘‘हे देवा तुझे आभार, माझ्या सर्व चुका जळून गेल्या.’’ केव्हढी स्थिरता! केव्हढा देवावर विश्वास! आणि आपण? खिशातून दहा रुपयांची नोट पडली तर पडली म्हणून अर्धा दिवस दु:खात काढतो. दृष्टिकोन, विचार महत्त्वाचा!

डॉ. बाख यांच्या मते कोणताही रोग, आजार हा दुष्ट किंवा क्रूर नसून नियतीने आपल्याला दिलेला एक संकेतच असतो. आपल्याकडून कोठेतरी, काहीतरी चूक नक्कीच झाली आहे किंवा होत आहे. विचारांची दिशा चुकल्याचे ते द्योतक आहे तसेच आपण पुढे आणखी मोठी चूक करू नये असेही जणू नियती आपणास सांगत असते. वेळीच सुधारा व पुढील धोका टाळा.

प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस दडलेला असतो. त्याचे चांगले गुण म्हणजे एकाग्रता, शहाणपण, मानवता, चांगले हेतू, धैर्य स्थैर्य इ. होत. जर हे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वातून, आचरणातून प्रकट झाले नाहीत तर त्या विरोधी भावना, गुण दिसून येतात. उदा. क्रोध, लोभ, मोह, तिरस्कार, द्वेष, हाव, हेवा, क्रूरता, स्वार्थ, दुर्लक्ष, निष्काळजीपणा इत्यादी. बारकाईने पाहिल्यास या व इतर विरोधी भावनाच सर्व आजारांस कारणीभूत असतात असे दिसते.

(क्रमश:)