शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कुणी पाणी देता का पाणी?

By admin | Updated: May 2, 2015 05:29 IST

तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही.

पुणे : तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही. महापालिकेकडून मानकांपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे करून पाटबंधारे विभागाकडून २०११ नंतर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा करारही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य पद्धतीने सुनियोजन होत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे तट पेटत आहेत. महापालिकेस शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस सध्याची लोकसंख्या गृहीत धरता दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरासाठी पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जवळपास १५ ते १६ टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, कागदपत्रावर कुठेही या पाण्याच्या देवाणघेवाणीचा करार झालेला नाही. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस दरदिवशी १२५0 ते १३00 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार, १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर भविष्यात शहराचा विस्तार गृहीत धरत महापालिकेस १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. राज्यशासनाने महापालिकेत आणखी नवीन ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आणखी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)