शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का? आधी कोरोना टेस्ट करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेल्या रेल्वे गाड्याची संख्या आता पुन्हा वाढली आहे. प्रवासी संख्येतदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेल्या रेल्वे गाड्याची संख्या आता पुन्हा वाढली आहे. प्रवासी संख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे काही राज्य सरकारने कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे असून प्रवाशांनी तो जवळ बाळगावा असेही आवाहन केले आहे.

कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश आदी प्रमुख राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकरीता आरटीपीसीआरची चाचणी अनिवार्य केली.

बॉक्स १

सध्या सुरू असलेले रेल्वे :

पुणे - मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, पुणे - हावडा दुरांतो एक्सप्रेस, पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेस, पुणे -दानापूर एक्सप्रेस, कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, आदी सह पुणे स्थानकावरून प्रवास सुरु करणाऱ्या जवळपास पन्नास रेल्वे सुरू झाल्या आहेत.

बॉक्स २

या रेल्वे कधी सुरू होणार :

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्सप्रेस, पुणे -मुंबई इंटरसिटी, पुणे - सोलापूर इंटरसिटी, पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, पुणे - बिलासपूर, पुणे - लखनऊ एक्सप्रेस या गाडया अद्यापही बंद आहेत.

बॉक्स ३

पॅसेंजर कधी सुरू होणार ?

पॅसेंजर गाड्याचे घोडे कुठे अडले :

पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन पॅसेंजर गाड्याची सेवा बंद करणार आहे. तसेच येणाऱ्या नवीन झीरो बेस टाईम टेबलमध्ये अनेक गाड्या रद्द तर अनेक गाड्यांचे थांबे रद्द होणार आहे. हे टाईम टेबल डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी पॅसेंजर गाड्याचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल.

बॉक्स ४

कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक ज्या राज्यानी निर्बंध लावले आहेत. त्या राज्यात रेल्वेने जाताना कोरोना टेस्ट केलेली असावी. तसेच आपले जर लसीकरण झाले असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील सोबत ठेवणे उचित होईल. त्यामुळे प्रवाशांनी दुसऱ्या राज्यात ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोट :

प्रवासी ज्या राज्यात जात आहेत त्या राज्याचे निर्बंधाचे पालन करावे. रेल्वे त्या बद्दलची माहिती तिकीट काढताना सिस्टीमवर व स्थानकावर देत आहे.

मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.