शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मलुे पोळी भाजी खायला नकोच म्हणतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

पालक समुपदेशक म्हणून काम करताना मला एक अनुभव आला, चार-साडेचार वर्षांची वैष्णवी, एका डॉक्टरची मुलगी हिच्याबद्दल तिची आई ...

पालक समुपदेशक म्हणून काम करताना मला एक अनुभव आला, चार-साडेचार वर्षांची वैष्णवी, एका डॉक्टरची मुलगी हिच्याबद्दल तिची आई सारखीच तक्रार करत हाती. तिने तर, "आई, तुला स्वयंपाक छान करताच येत नाही!" म्हणून मोकळी झाली. तिने आईच्या मागे लागून मला घरी बोलवून घेण्यासाठी फोन करायला लावला. तसा तिच्या आईचा मला फोन आला आणि आई चांगली होती, समंजस होती, स्वतः शिकून घेण्याची तिची मनाची तयारी असलेली मला जाणवली. हे तिच्या संवादातून लक्षात आले. तिने पोळी/चपाती कशी मऊ बनवता, पदर कसे येतात पोळीला ते मला शिकवा म्हणाली. म्हणजे ह्या छोट्याशा मुलीने किती बारीक निरीक्षण केले होते ह्याचे तर मलासुद्धा खूपच आश्चर्य वाटले होते. त्यावरूनच लक्षात येते की मुलांना पोळी भाजीसुध्दा आवडते मात्र हे पदार्थ बनवितानाच मुलांना ते आवडतील कशा व त्याच्या आवडीनुसार आपल्या बनविण्याचा प्रयत्न कसा करता येईल याकडे लक्ष दिलेच पाहिजे.

मध्यंतरी वृत्तपत्रात श्राद्ध पक्षातील विविध पदार्थ यावर एक लेख आला होता, त्यामध्ये म्हटले होते की पूर्वीच्या काळी आहारशास्त्रावर फारशी जनजागृती नव्हती. त्यामुळे लोकांनी पोषक आहार करून खायला हवे. त्यामुळे त्याला विविध रीतीरिवाजांची जोड देत विविध पदार्थ बनविण्याची प्रथा निर्माण केली गेली. एखाद्या आजाराने मृत्यू पावलेल्या माणसांच्या घरातील इतर सदस्यांना तसा आजार लागू नये यासाठी श्राध्दाच्या निमित्ताने घरात ५ भाज्या, लिंबू, कोशिंबिरी, कढी, खीर, वडा, घारगा, चपाती, लिंबू चटणी, थापी वाडी, वडी रसपट, पंचामृत, भातवरण केले जायचे. या सगळ्या गोष्टी पोटात गेल्यामुळे सगळे रस, क्षार, प्रथिने, कर्बोदके, म्हणजे पोषक गोष्टी प्रत्येकाच्या जेवणातून शरीरात अवश्य जातील आणि सगळेच सुदृढ होतील. मात्र आता आहारशास्त्रावर बऱ्यापैकी संशोधन झाले आहे, डाएटिंग वगैरे गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या आहार काय असावा व नसावा याची शास्त्रीय माहितीही पालकांना सहज उपलब्ध होते. मात्र मुलांचा चमचमीत खाण्याचा हट्ट दूर करून पालकांनी त्यांना सकस आहार देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पालकांच्या तक्रारी असतात की, मुले आई-बाबांचे ऐकत नाहीत, अशा वेळी आहारतज्ज्ञ, डॉक्टर, शाळेतले शिक्षक यांच्याकडूनही त्यांना अशा गोष्टी सांगता येऊ शकतात.

मुलांना आत्तापर्यंत पुरणपोळी, गूळपोळी, विविध प्रकारचे पराठे, थालिपीठ, इडली दोसे, अप्पे, ढोकळा, नारळी भात इ. असे विविध प्रकारचे पदार्थ ते नको म्हटले तरी त्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या आवडची चव लक्षात घेऊन त्या काळजीपूर्वक बनविणे महत्त्वाचे आहे. हे पाळणाघरात मुले सांभाळताना मी अनुभवले आहे. सध्या समाजातील आहारात कमालीचा बदल झाला आहे, जो घतक आहे हे सगळ्यांना समजते आहे पण वळत नाहीये? प्रवाहविरुद्ध पोहण्याची भीती आहे की काय? असे वाटते! आपल्याकडे जागतिकीकरण झाल्यापासून सगळ्याच बाबतीतील आपल्या रूढीपरंपरा सोडून बाहेरच्या परंपरा स्वीकारून पालक काय मिळवतायेत? हे त्यांच्या लक्षात येत कसे नाही? याचा विचार केला पाहिजे.

...रचना वनारसे...

(पालक मार्गदर्शक

वर्तन समस्या विश्लेषक आणि उपायोजक)