शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

शासनाची तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास का?

By admin | Updated: August 9, 2015 03:50 IST

दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. अनेकांच्या जीवनाची वाताहत होऊन ऐन तारुण्यातील युवक दारूच्या व्यसनामुळे आपला जीव गमावतात. तर विषारी दारूमुळे एकएकी शेकडो जणांचे

- युगंधरा चाकणकर, पुणेदारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. अनेकांच्या जीवनाची वाताहत होऊन ऐन तारुण्यातील युवक दारूच्या व्यसनामुळे आपला जीव गमावतात. तर विषारी दारूमुळे एकएकी शेकडो जणांचे प्राण गेले आहेत. असे असतानाही, केवळ महसुलाच्या नावाखाली शासनाची तिजोरी भरण्यासाठी दारू दुकानांचे परवाने देऊन शासन सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे. त्यामुळे किमान आता तरी शासनाने जागे होऊन महाराष्ट्रात १00 टक्के दारूबंदी लागू करण्याची गरज आहे. राज्य शासनाला विकासकामांसाठी उत्पन्नाची आवश्यकता असते. ही कामे नागरिकांसाठीच केली जातात. त्यासाठी शासनाकडून वेगवेगळे कर आकारून निधी उभा केला जातो. मात्र, महाराष्ट्रातही शासनास दारू दुकानांच्या परवान्यातून तसेच मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात कर मिळतो. मात्र, हा निधी शासनाला मिळत असला तरी, या परवानाधारक दुकानांमुळे समाजात निर्माण होणाऱ्या समस्या अतिशय गंभीर बनत चालल्या आहेत. शहरात अनेक परवानाधारक देशी दारूंची दुकाने शाळा, महाविद्यालये तसेच लोकवस्तीच्या परिसरात आहेत. त्यामुळे आपोआपच शाळांच्या परिसरात दिवसभर मद्यपींचा उपद्रव असतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत. शहरातील अनेक सोसायट्या, तसेच वर्दळीच्या ठिकाणीही अशी परवानाधारक दुकाने असतात. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे या ठिकाणी होणाऱ्या उपद्रवाच्या तक्रारी घेऊन नागरिक येतात. त्यानुसार, आम्हीसुद्धा संबंधित यंत्रणांकडे त्याबाबत तक्रारी करतो. मात्र, त्याला अक्षरश: केराची टोपली दाखविली जाते. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढून सामाजिक स्वास्थ्यच धोक्यात येते. अशा वेळी, शासनाला उत्पन्न महत्त्वाचे आहे की सामाजिक सुरक्षा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरात बाटली आडवी का नाही? ग्रामीण भागामध्ये शासनाने परवाना दिलेल्या दुकानांना ग्रामस्थांनी अथवा त्या गावांमधील महिलांनी विरोध केल्यास त्या ठिकाणी मतदान घेऊन तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव करून ५0 टक्क्याहून अधिक महिलांनी बंदीच्या बाजूने मतदान केल्यास ही दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते. मात्र, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये एखाद्या प्रभागात अथवा वॉर्डात दारूबंदी करावयाची असल्यास काय, हा मोठा प्रश्न आहे. शहराची लोकसंख्या 40 लाखांच्या पुढे असली तरी, प्रभागातील महिलांची संख्या जेमतेम 10 ते 15 हजारांच्या घरात असते. त्यामुळे शासनाने मोठ्या शहरांमध्ये केवळ दारू वाईट असल्याची भित्तिपत्रके न रंगवता या समस्येतून नागरिकांना कशा प्रकारे मुक्ती मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.