शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोणी ‘पाणी देता का, पाणी?’, शासनाची उदासीनता मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:14 IST

कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या

राजेगाव : कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या जिवाला मुकावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील वनविभागाच्या क्षेत्रात पाहायला मिळताना सध्या दिसत आहे. मानवी जीव आपली तहानभूक कसेही भागवतील; मात्र हे मुके वन्यजीव ‘कुणी पाणी देता का पाणी?’ अशी हाक कोणाला मारणार?सध्या उन्हाची चाहूल अधिक वाढल्याने मानवी शरीराची लाही लाही होताना दिसत आहे. त्यातच इथले काही विहिरी, कूपनलिकासुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत. या भागाला भीमा नदीपात्राचा आधार आहे. तोही आता कमी कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मानवी जीवनाला देखील यंदा विचार करण्याची वेळ आली. वन्यप्राण्यांना ओला चारा मिळणे तर दूरच; पण आपली तहान भागवण्यासाठी थोडे पाणीही उपलब्ध होत नाही, याची मोठी खंत निसर्गप्रेमींना वाटत आहे. आपला वनातील अधिवास सोडून हे वन्यजीव आपल्या जिवाची तमा न बाळगता पोटापाण्यासाठी थेट लोकवस्तीत येऊ लागल्याचे मोठे आश्चर्य दिसून येत आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन कार्य करत असतानादेखील शासनाची ही उदासीनता या मुक्या प्राण्यांच्या जिवावर बेतत आहे.राजेगावच्या परिसराला मोठ्या प्रमाणावर वन व उजनी क्षेत्र लाभलेले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने ससे, मोर, लांडगा, कोल्हा, हरीण-काळवीट आदी विविध जातीचे पशुपक्षी दिवसाढवळ्या राजेगावनजीक मानवी वस्त्यांवर भटकंती करत अनेक दुर्घटनांचे बळी ठरत आहेत. यासाठी या वन्यप्राण्यांची मानवी वस्तीतील भटकंती थांबवण्यासाठी शासनस्तरावर जागोजागी पाणवठे करण्याची मोहीम जलद गतीने सुरु होणे खूप गरजेचे आहे.सध्या सोशल मीडियावर पशुपक्ष्यांच्या बचावासाठी जागृती करणारे अनेक संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहेत. यामधून पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवण्याचे मोठे सत्कार्य अनेक नागरिक करत आहेत. येथील पक्षिप्रेमी यांनी सोशल मीडियातच नव्हे तर प्रत्यक्षात शाळा, विद्यालये आदींमध्ये हे उपक्रम राबवून पक्षी बचावाचे संदेश देत आहेत. शासनानेदेखील अशा वन्यजीव व पशुपक्ष्यांच्या जिवासाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. निसर्गातील या जिवांना चारा व पाणी देऊन जगवण्याची जबाबदारी आपलीच हेपण तेवढेच खरे ना!