शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

आम्हाला कोणी पाणी देता का... पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:10 IST

लाभार्थी शेतकऱ्यांची आर्त हाक : पिके लागली जळू; आंदोलनाचा इशारा शेलपिंपळगाव : मांजरेवाडी (ता. शिरूर) हद्दीतील चासकमान कालव्याच्या पोटपाटाला ...

लाभार्थी शेतकऱ्यांची आर्त हाक : पिके लागली जळू; आंदोलनाचा इशारा

शेलपिंपळगाव : मांजरेवाडी (ता. शिरूर) हद्दीतील चासकमान कालव्याच्या पोटपाटाला पाणी सोडत नसल्याने “पाणी असूनही घसा कोरडाच” अशी परिस्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे. पाणी वितरीत करण्यासंदर्भात वारंवार पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शेतीची तहान लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने तात्काळ डाव्या कालव्यातून डीवाय दहाला पाणी सोडावे; अन्यथा आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

गेल्या दीड - दोन महिन्यांपासून चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत आवर्तन सोडण्यात आले आहे. उन्हाळी हंगामातील पिक सिंचनाच्या दृष्टीने हे आवर्तन अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मात्र मांजरेवाडी हद्दीतून वाजेवाडी, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण गावांमध्ये पाणी वितरीत करण्यासाठी असलेल्या पोटकालव्याला पाणी न सोडल्यामुळे परिसरातील ऊस, बाजरी, मिरची, गवार, भेंडी, भुईमूग, फुलशेती पाण्याविना जळू लागली आहे.

उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजेश म्हस्के, माजी चेअरमन पंकज हरगुडे, कचरू वाजे, संपत काटकर, संदीप साबळे, अशोक साबळे, अशोक काटकर, संतोष शेटे, शिवाजी म्हस्के, नवनाथ शेटे, प्रवीण शेटे, भरत काटकर, संजय म्हस्के, सागर शेटे, संभाजी नाणेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

हक्कांसाठी आंदोलने का ?

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने आमच्या शेकडो एकर जमीन संपादित केल्या आहेत. त्यामुळे चासकमान धरणातील पाणीआमच्या हक्काचे आहे. मात्र हक्काच्याच पाण्यासाठी आम्हाला वारंवार संघर्ष का? असा प्रश्न येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

साबळेवाडी परिसरातील ऊसपिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. (छाया : भानुदास पऱ्हाड)