शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

आरटीई मुलांना शाळेबाहेर ठेवण्यासाठी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 00:42 IST

शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते.

पुणे : शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते. मात्र, शिक्षण विभागाने घालून ठेवलेल्या आरटीई प्रवेशामुळे शहरातील हजारो बालकांवर सोमवारी घरी बसण्याची वेळ आली. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, आज याच कायद्यामुळे आमची मुले शाळेबाहेर राहिली आहेत, अशा संतप्त भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राविण्यात आली. विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र, राज्य शासनाने प्रवेशप्रक्रिया सुरू असताना आरटीई प्रवेश केवळ पहिलीसाठी लागू राहतील, असा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यामुळे सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया विस्कळीत झाली. न्यायालयात याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. अवंतिका सोनवणे यांच्यासह सुमारे ४० पालकांना कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. मात्र, ही सर्व मुले आरटीई प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. अवंतिका सोनवणे म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने आमच्या मुलांना आरटीईअंतर्गत न्यू इंडिया स्कूलमध्ये पहिली व पूर्वप्राथमिक वर्गासाठी प्रवेश दिला; मात्र एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही. दोन ते अडीच महिन्यांपासून आम्ही शाळेचे खेटे घालत आहोत.’’ (प्रतिनिधी)- ‘आज शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे किमान आज तरी आमच्या मुलांना प्रवेश मिळेल का? याबाबत विचारणा करण्यासाठी काही पालक शाळेत गेलो होतो. मात्र, प्रवेशाबाबत शाळेकडून नकार कळविण्यात आला. सोमवारी आमच्याशेजारी राहणारी मुले शाळेत जात होती; परंतु आमची मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. त्यामुळे मन खिन्न झाले,’ अशा भावना व्यक्त करून सोनवणे म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाला आरटीईनुसार न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे मी विश्वनिर्मल प्रायमरी स्कूलमधून मुलाचा प्रवेश रद्द केला. मात्र, आता या शाळेतही माझ्या मुलाला प्रवेश मिळत नाही.त्यामुळे आरटीईमुळे मुलांना शिक्षणाचा हक्क मिळतो की ते प्रवेशापासून वंचित ठेवले जातात, हेच समजत नाही.