शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

‘नवीन पतसंस्था नको रे बाबा..’

By admin | Updated: December 9, 2014 00:02 IST

आर्थिक घोटाळे मोठय़ा प्रमाणात उघडकीस आले. जादा व्याजाच्या आमिषाने ठेवीदारांनी केलेली गुंतवणूक या घोटाळ्यांमुळे परत मिळेनाशी झाली.

महेंद्र कांबळे ल्ल बारामती
बारामती : पतसंस्थांमधील 
आर्थिक घोटाळे मोठय़ा प्रमाणात उघडकीस आले. जादा व्याजाच्या आमिषाने ठेवीदारांनी केलेली गुंतवणूक या घोटाळ्यांमुळे 
परत मिळेनाशी झाली. त्यामुळे सहकार कायद्यात बदल झाल्यानंतर नवीन पतसंस्था काढण्यासाठी 
जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘नवीन पतसंस्था नको रे बाबा..’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 
पतसंस्था उघडण्यासाठी काही वर्ष बंदी होती. मागील 6 महिन्यांपासून नवीन पतसंस्थांना मान्यता देण्यास सुरुवात झाली आहे. 
मात्र, नवीन पतसंस्था सुरू करण्यासाठी दुय्यम निबंधक (सहकार) कार्यालयांमध्ये चौकशी होत आहे. परंतु, संस्था सुरू करण्यास कोणी धजावत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी पतसंस्था स्थापन करण्यासाठी विशेष नियमावली नव्हती. त्यामुळे मुख्य प्रवर्तकांसह आवश्यक असलेल्या संचालक मंडळांची यादी, सभासदांची यादी सादर केल्यास सहज पतसंस्था स्थापन करण्यास मान्यता मिळत होती. आता अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून राजकारण करणा:या पुढा:यांना चांगलाच चाप बसला आहे. 
सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत पतसंस्थांमध्ये जादा व्याजदर ठेवींवर मिळते. त्यामुळे त्या ठिकाणी गुंतवणूकदारांची ओढ असते. परंतु, अनेक राजकीय मंडळींच्या ताब्यात असलेल्या पतसंस्थांमध्ये कोटय़ावधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. 
सहकार कायद्यात घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची विशेष तरतूद नव्हती. त्यामुळे या घोटाळेबाज पुढा:यांचे फावले होते. परंतु, सहकार संस्थांचे प्राधिकरण, पतसंस्था स्थापन करण्यासाठी जाचक अटी घालण्यात आल्या.  
किमान 3 हजार सभासद पतसंस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर मुख्य प्रवर्तकासह सर्व संचालक मंडळाने प्रत्येकी किमान 5क् हजार रुपये ठेव ठेवणो आवश्यक आहे. त्याचबरोबर या संचालक मंडळाला पोलिसांकडून वर्तणुकीचा दाखला प्रस्ताव दाखल करताना अनिवार्य करण्यात आला आहे. पूर्वीच्या पतसंस्थेत कोणत्याही कारणांनी कारवाई झाली असेल, तर त्यांना संचालक अथवा सभासद देखील होता येणार नाही, अशी अट आहे.  (प्रतिनिधी)
 
मल्टीस्टेट पतसंस्थांचे पेव 
राज्यात सर्वच प्रकारच्या पतसंस्था सुरू करण्यास गेल्या काही वर्षात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राजकीय पुढा:यांनी मल्टीस्टेट, मल्टी को ऑपरेटिव्हच्या नावाखाली केंद्र शासनाच्या सहकार कायद्यांतर्गत पतसंस्था सुरू केल्या. त्यांच्या शाखा विस्तारल्या आहेत. परंतु, ज्या शाखांमध्ये घोटाळे उघडकीस आले, तेथील गुंतवणूकदारांची मात्र, परवड होत असल्याचे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थांच्या माध्यमातून दिसून येत आहे. या मल्टीस्टेट पतसंस्थांवर देखील राज्यातील दुय्यम निबंधक अधिका:यांची वचक असावी, अशी मागणी केली जात आहे.
 
पतसंस्था स्थापन केल्यानंतर त्याचे आर्थिक व्यवहार योग्यरित्या हाताळले जात नव्हते. त्यामुळे नव्या बदललेल्या सहकार कायद्यात अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. अगदी पूर्वीच्या अवसानायात पतसंस्थेत सभासद असल्यास त्यांना नव्या पतसंस्थेत सभासद होता येणार नाही, अशी तरतूद केली आहे. त्यामुळे 6 महिन्यात एकही पतसंस्था नव्याने स्थापन झालेली नाही. 
- देविदास मिसाळ,सहकार निबंधक 
 
4यापूर्वी 2क् ते 25 हजार रुपयांच्या भागभांडवलावर पतसंस्था स्थापन करण्यात येत होती. आर्थिक उलाढालीचे चांगले साधन म्हणून गावपुढारी पतसंस्था स्थापन करण्यावर भर देत होते. त्यातून अनेक घोटाळे उघडकीस आले. त्यामुळे हे र्निबध लादण्यात आले आहेत. 
46 महिन्यांपासून नवीन पतसंस्था काढण्यासाठी सहकार खात्याने मान्यता दिली आहे. तरी देखील चौकशी करून गेल्यानंतर पुन्हा पतसंस्था स्थापन करणारे ‘नवीन पतसंस्था नको रे बाबा..’ असे म्हणत आहेत. या नव्या नियमावलीचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे.  त्यामुळे पतसंस्थांना चांगले दिवस येणार आहेत.