शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नारायणगावातून प्रवास नको रे बाबा!

By admin | Updated: June 8, 2015 04:57 IST

शहरातून प्रवास नको रे बाबा...अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. येथे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहे.

नारायणगाव : शहरातून प्रवास नको रे बाबा...अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. येथे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी शहरातील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करण्याची मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी करीत आहेत.पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव शहर हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या गावामधून पुणे किंवा नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना शहरातूनच जावे लागते. नारायणगाव बसस्थानकासमोर कायम वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन तसेच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या लगतचे व्यावसायिक त्यांच्या दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला माल रस्त्यावर आणून ठेवत असल्याने वाहतूककोंडीला हे व्यावसायिकदेखील जबाबदार आहेत, जीप, टेम्पो, रिक्षा ही वाहने रस्त्यावर असतात, त्यांचेवरदेखील कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियंत्रणाकरिता एकच पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. त्याच्या सोबतीला दोन ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. ते वाहतूककोंडी दूर करण्यासाठी दिवसभर भरउन्हात महामार्गावर उभे असतात. दिवसभर वाहतूककोंडी दूर करून रात्री उशिरा घरी जातात. महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस खाते व राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही कार्यवाही लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशी करीत आहेत.