शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका

By admin | Updated: April 25, 2016 02:45 IST

मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या

पुणे : मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करून ते त्यांच्या जखमेवर मीठ का चोळत आहोत अशी विचारणा सजग नागरिक मंचच्यावतीने पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे. कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यापार्श्वभुमीवर सजग नागरिक मंचने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांना त्यांनी याबाबात ११ प्रश्न विचारले आहेत. आॅक्टोबर - जून या काळातील दौंड व इंदापूरची पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकी ०. ३ टीएमसी असल्याचे पाटबंधारे खात्याचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना त्याच्या ४ पट पाणी गेल्या ६ महिन्यात त्यांच्या साठी सोडले गेले त्याचे काय झाले ?, कालव्यातून इंदापूरला पाणी पोचेपर्यंत १. ५० टीएमसी तर दौंड ला पाणी पोहोचे पर्यत १. ० टीएमसी पाण्याची गळती होते, हे आपणास माहित आहे का ? त्यांना आता १ टीएमसी पाणी हवे असेल तर कालव्यातून २.५० टीएमसी पाणी सोडावे लागेल. एवढे पाणी धरणात आहे का? इंदापूर भोगोलिकदृष्टया उजनीच्या जवळ असताना त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज उजनीच्या अचल साठ्यातून भागवता येणार नाही का? दौंडला पाणी पोचेपर्यंत पाणी गळती लक्षात घेता दौंडला रेल्वे ने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आपण विचार केला का ?