शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पुण्याचे पाणी कदापिही पळवू देणार नाही

By admin | Updated: April 26, 2016 00:59 IST

पुणेकरांचे पाणी पळवू देणार नाही, असे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांच्या सभासदांनी सोमवारी मुख्य सभेत सांगितले.

पुुणे : शिक्षण विभागाचे लेखी आदेश असतानाही शहरातील खासगी शाळांकडून पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठीचे बंधन घातले जात आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, शाळेचा निकाल हातात देण्याआधीच पुढच्या इयत्तेसाठीचे साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. शाळेकडून जास्तीत जास्त साहित्य खपविण्यासाठी वेगगेवळया क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक वर्षीचा गणवेश बदलण्यापासून वह्यांचे रंग बदलण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांवर घरात असलेले शैक्षणिक साहित्य फेकून देण्याची वेळ आली आहे. तर, या शाळेने पालकांना विकलेल्या याच साहित्याची ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बाजात जाऊन चौकशी केली असता, २० ते २५ टक्के कमी दराने हे साहित्य मिळत असल्याचेही समोर आले आहे. शिक्षण विभागाचे कानावर हात खासगी शाळांमधील शालेय साहित्य विक्रीस राज्य शासनानेच २००४मध्ये एका परिपत्रकाद्वारे मज्जाव केलेला आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून शाळांकडून सक्ती केली जात आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील सर्वच शाळांमध्ये हा प्रकार सुरू असताना शालेय शिक्षण विभाग मात्र स्वत: कारवाई करण्यास तयार नाही. एखद्या पालकाने तक्रार केल्यास कारवाई करण्यास आपण तयार असल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी खासगीत सांगतात. मात्र, एखाद्या पालकाने तक्रार केल्यास आणि त्याचे नाव पुढे आल्यास शाळेकडून संबंधिताला त्रास झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास मात्र शिक्षण विभाग तयार नाही. त्यामुळे शहरात असे गैरप्रकार सुरू असतानाही शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करून या प्रकरांना खतपाणीच घालत असल्याचे दिसून येते. शालेय साहित्य शाळांमधूनच घेतले पाहिजे, अशी सक्ती करणे खूप चुकीचे आहे. ही पुस्तके शाळेबाहेरील विक्रेत्यांकडे कमी किमतीत मिळत असतानाही आम्हाला विनाकारण चढ्या दराने घ्यावी लागतात. ही शाळांकडून होणारी लूट असून, त्याचा भुर्दंड आम्ही का सहन करायचा ?- पालक >रंग बदलून माथी मारले जातेय साहित्य शैक्षणिक अध्यापन हे पहिले कर्तव्य असलेल्या शाळांकडून पैसे उकळण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. या खासगी शाळांकडून प्रत्येक इयत्तेच्या मुलांसाठी वेगळ्या रंगाचा गणवेश, वेगळ्या रंगाच्या वह्या, वेगळ्या रंगाचे बूट तसेच मोजे दिले जात आहेत. त्यामुळे एखाद्या पालकाकडे संबंधित मुलासाठी घेतलेले यापैकी कोणतेही साहित्य शिल्लक आणि वापरण्यायोग्य असले, तरी पुढच्या इयत्तेत ते वापरण्यास शाळेकडून मनाई होत असल्याने असे साहित्य पालकांना भंगारात विकावे लागत आहे. या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पाल्यांच्या काही वह्या तसेच मागील वर्षीचे दप्तर सुस्थितीत होते. ते तिसरीतही सहज वापरता येणे शक्य होते; मात्र दुसरीत असताना दप्तराचा रंग काळा होता, आता तिसरीसाठी लाल रंगाचे दप्तर शाळेने निश्चित केले आहे. त्यामुळे पालकांना पुन्हा ४५० रुपये घालवून नवीन दप्तर घ्यावे लागले.>तिसरीसाठी १५ पुस्तके २० वह्या एकीकडे राज्य शासनाकडून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असतानाच; दुसरीकडे शाळांकडून मात्र शैक्षणिक साहित्य खपविण्याच्या नावाखाली अभ्यासाचे ओझे वाढविले जात असल्याचे या शालेय साहित्य विक्रीवरून समोर आले आहे. अवघ्या तिसऱ्या इयत्तेत गेलेल्या या मुलासाठी अभ्यासाठी तब्बल १४ पुस्तके देण्यात आली असून, वर्षभरासाठी २० वह्या पालकांना देण्यात आल्या आहेत. या सर्वांची किंमत तब्बल १,५०० रुपये आहे.