शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शेतकऱ्यांची थडगी रचून विकास नको : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:30 IST

शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.

जेजुरी : शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.येथे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया कोथळे ते जेजुरी या ८६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा, साठवण बंधाºयाच्या कामाचा शुभारंभ व ज्ञानरंजन वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मनसेचे नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. धनंजय भोईटे, संभाजी काळाणे, सुनील आस्वलीकर, गंगाराम जगदाळे, बाळासाहेब धाबेकर आदी उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांना उद्ध्वस्त करून तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक बाधित शेतकºयांनी याबाबत आपणास माहिती दिली आहे. शेतकºयांची संमती असेल तर कोणीही विमानतळास विरोध करणार नाही; मात्र दहशत वा फसवाफसवी करून विमानतळ होऊ देणार नाही. विरोधासाठी सर्वांच्या पुढे आपण असू. विमानतळाला एक इंचही जमीन मिळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय शासनाचा पटसंख्येअभावी शाळा बंद करून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासकीय षड्यंत्र असून ते हाणून पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका सहीने येणारे गुंजवणीचे पाणी गेले कुठे, असे आरोप करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर टीका केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्ह्यातील एकही शाळा पतसंख्येअभावी बंद पडणार नसल्याची ग्वाही दिली. बाबा जाधवराव यांनी विमानतळाला विरोध करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकºयांच्या बरोबर यावे, असे आवाहन केले.नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले, संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. धनंजय भोईटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी