शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शेतकऱ्यांची थडगी रचून विकास नको : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:30 IST

शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.

जेजुरी : शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.येथे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया कोथळे ते जेजुरी या ८६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा, साठवण बंधाºयाच्या कामाचा शुभारंभ व ज्ञानरंजन वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मनसेचे नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. धनंजय भोईटे, संभाजी काळाणे, सुनील आस्वलीकर, गंगाराम जगदाळे, बाळासाहेब धाबेकर आदी उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांना उद्ध्वस्त करून तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक बाधित शेतकºयांनी याबाबत आपणास माहिती दिली आहे. शेतकºयांची संमती असेल तर कोणीही विमानतळास विरोध करणार नाही; मात्र दहशत वा फसवाफसवी करून विमानतळ होऊ देणार नाही. विरोधासाठी सर्वांच्या पुढे आपण असू. विमानतळाला एक इंचही जमीन मिळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय शासनाचा पटसंख्येअभावी शाळा बंद करून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासकीय षड्यंत्र असून ते हाणून पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका सहीने येणारे गुंजवणीचे पाणी गेले कुठे, असे आरोप करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर टीका केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्ह्यातील एकही शाळा पतसंख्येअभावी बंद पडणार नसल्याची ग्वाही दिली. बाबा जाधवराव यांनी विमानतळाला विरोध करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकºयांच्या बरोबर यावे, असे आवाहन केले.नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले, संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. धनंजय भोईटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी