शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:10 IST

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी ...

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र, आपण त्या योजना राबविण्यासाठी कमी पडतो. परिणामी गावांचा विकास थांबतो. गावातील विकास हा गावातील लोकप्रतिनिधींना समजणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

यशदा अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सत्र समन्वयक एस. डी. बिरासदार, आर. टी. दिघडे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, आनंद दरवेशी, असीम शेख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड, मुळशी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाल्या, मागील दीड वर्षापासून देशासह जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या काळात लोकांची वाताहत झाली आहे. या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय बदल केले पाहिजेत, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपण कुठे कमी पडतो, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते.

स्वच्छता, पाणी, शाळा, आरोग्य, शिक्षण, बचत गट, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, पर्यावरण अशी अनेक कामे आपण राबविली पाहिजेत. सरपंच म्हणून आपण स्वत:ला सेवक समजावे, उगाच सरपंच म्हणून मिरविण्यापेक्षा आपण लोकांना विकासाच्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी खूप विश्वासाने आपल्याला जबाबदारीने निवडून दिले आहे. कोरोनातून लोकांचे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत असताना आता महापुराचे संकट आले आहे. अनेक संकट असतात यात सरपंच अथवा गावचा पालक म्हणून स्वत:ची भूमिका महत्त्वाची आहे. गावच्या विकासात राजकारण खूप असते, यातून गावचा विकास रखडतो. सरपंच म्हणून आमच्या जबाबदाऱ्या ओळखून आपण समाजासाठी काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.

—————————————————