शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:10 IST

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी ...

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र, आपण त्या योजना राबविण्यासाठी कमी पडतो. परिणामी गावांचा विकास थांबतो. गावातील विकास हा गावातील लोकप्रतिनिधींना समजणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

यशदा अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सत्र समन्वयक एस. डी. बिरासदार, आर. टी. दिघडे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, आनंद दरवेशी, असीम शेख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड, मुळशी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाल्या, मागील दीड वर्षापासून देशासह जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या काळात लोकांची वाताहत झाली आहे. या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय बदल केले पाहिजेत, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपण कुठे कमी पडतो, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते.

स्वच्छता, पाणी, शाळा, आरोग्य, शिक्षण, बचत गट, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, पर्यावरण अशी अनेक कामे आपण राबविली पाहिजेत. सरपंच म्हणून आपण स्वत:ला सेवक समजावे, उगाच सरपंच म्हणून मिरविण्यापेक्षा आपण लोकांना विकासाच्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी खूप विश्वासाने आपल्याला जबाबदारीने निवडून दिले आहे. कोरोनातून लोकांचे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत असताना आता महापुराचे संकट आले आहे. अनेक संकट असतात यात सरपंच अथवा गावचा पालक म्हणून स्वत:ची भूमिका महत्त्वाची आहे. गावच्या विकासात राजकारण खूप असते, यातून गावचा विकास रखडतो. सरपंच म्हणून आमच्या जबाबदाऱ्या ओळखून आपण समाजासाठी काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.

—————————————————