शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:10 IST

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी ...

बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र, आपण त्या योजना राबविण्यासाठी कमी पडतो. परिणामी गावांचा विकास थांबतो. गावातील विकास हा गावातील लोकप्रतिनिधींना समजणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

यशदा अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सत्र समन्वयक एस. डी. बिरासदार, आर. टी. दिघडे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, आनंद दरवेशी, असीम शेख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड, मुळशी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाल्या, मागील दीड वर्षापासून देशासह जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या काळात लोकांची वाताहत झाली आहे. या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय बदल केले पाहिजेत, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपण कुठे कमी पडतो, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते.

स्वच्छता, पाणी, शाळा, आरोग्य, शिक्षण, बचत गट, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, पर्यावरण अशी अनेक कामे आपण राबविली पाहिजेत. सरपंच म्हणून आपण स्वत:ला सेवक समजावे, उगाच सरपंच म्हणून मिरविण्यापेक्षा आपण लोकांना विकासाच्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी खूप विश्वासाने आपल्याला जबाबदारीने निवडून दिले आहे. कोरोनातून लोकांचे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत असताना आता महापुराचे संकट आले आहे. अनेक संकट असतात यात सरपंच अथवा गावचा पालक म्हणून स्वत:ची भूमिका महत्त्वाची आहे. गावच्या विकासात राजकारण खूप असते, यातून गावचा विकास रखडतो. सरपंच म्हणून आमच्या जबाबदाऱ्या ओळखून आपण समाजासाठी काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.

—————————————————