शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनामुळे दिलासा मिळणार : वळसे-पाटील

By admin | Updated: May 5, 2017 02:09 IST

कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय आज झाल्यामुळे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या पारनेर, जुन्नर, शिरूर तालुक्यातील

टाकळी हाजी : कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय आज झाल्यामुळे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या पारनेर, जुन्नर, शिरूर तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार असल्याची माहिती विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली.आज कुकडी व चासकमान प्रकल्प पाणीप्रश्नाविषयी पुणे सिंचन भवनात बैठक झाली. या वेळी विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, चासकमानचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर उपस्थित होते. कुकडी नदीला गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नसल्यामुळे जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यातील नदीकाठावरील ४७ ते ५० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. डाळिंब बागा, चारा पिके जळून गेले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. मळगंगा देवी यात्रेलाही पाणी आले नाही. त्यामुळे पाण्यावाचून भाविक-भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. शिरूर माजी आमदार  पोपटराव गावडे म्हणाले की, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पाण्यासाठी  चार ते पाच वेळा बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे दि. ७ ला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कुकडी कालव्यामधून हे पाणी नदीला सोडण्यात येणार आहे.  (वार्ताहर)