शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दिव्यांगांचे ‘दिव्य’ यश

By admin | Updated: May 31, 2017 04:10 IST

सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत काही शारीरिक मर्यादा असूनही दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ‘दिव्य’ यश मिळविले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत काही शारीरिक मर्यादा असूनही दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ‘दिव्य’ यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९३.०१ टक्के लागला असून, यंदा निकालात ४.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.राज्यात दरवर्षी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीही बारावीच्या परीक्षेला सामोरे जाऊन उत्तुंग यश मिळवितात. राज्य शिक्षण मंडळाकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार परीक्षेसाठी विशेष सवलतीही दिल्या जातात. याचा पुरेपूर लाभ घेत आपल्या शारीरिक समस्यांवर मात करीत या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, स्पास्टीक्स, अध्ययन अक्षमता, आॅटिझम, सेरेब्रल पाल्सी, गतिमंद अशा एकूण ५ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ६२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, ५ हजार २२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक १८८० विद्यार्थी अस्थिव्यंग असलेले आहेत. त्याखालोखाल अंध ११९३ व अध्ययन अक्षमता असलेले ११२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. आॅटीझम असलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे.