शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेणार

By admin | Updated: February 27, 2016 04:32 IST

राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार

पुणे : राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी काटकर यांनी सांगितले.या वर्षी जिल्ह्यात फेबु्रवारीतच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आताच टँकर पन्नाशीवर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने नुकताच ४० कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीही दिली आहे. यातून नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळपाणी योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहीर खोलीकरण व गाळ काढणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यात आता शासनाच्या कृषी विभागातर्फे टंचाईग्रस्त भागात शेतकऱ्याकडे स्वत:ची सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)यासाठी आवश्यक पात्रतामदत व पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध होऊन सदर योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी, तसेच शेततळ्याकरिता निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे, बोडी याचा लाभ घेतलेला नसावा. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य. प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. ४५ दिवसांत अर्ज सादर करणे. गावात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेली असावी.आॅनलाईन प्रक्रियावैयक्तिक लाभाच्या योजना ज्या विभागातर्फे दिल्या जातात, ते तालुका पातळीवरून याद्या करून त्याचे प्रस्ताव घेतात. मात्र, यात अधिकारी, पदाधिकारी यांच्या जवळच्यांनाच फायदा होता. पण, शेततळ्याची मागणी आॅनलाई असून प्रथम नोंद करणाऱ्यास प्राधान्य आहे.https://aaplesarkar.maharashtra.gov.in संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरायचा आहे. मूळ अर्ज भरून स्वत:च्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल.