शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार काटाबंद!

By admin | Updated: December 19, 2014 02:25 IST

case, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता कारखान्यांच्या विरोधात संघर्ष होण्याची शक्यता आहे

बारामती : साखर आयुक्तांचे आदेश असताना देखील जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी किमान आधारभूत किमतीपेक्षा (एफआरपी) ३०० ते ४०० रुपयांनी पहिला हप्ता कमी दिला आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता कारखान्यांच्या विरोधात संघर्ष होण्याची शक्यता आहे. एफआरपी प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जाणार आहे. तसेच प्रसंगी काटाबंद आंदोलन करण्यात येणार आहे.स्वाभिमानीच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्तांना पत्र दिले होते. एफआरपी प्रमाणे कारखान्यांनी दर जाहीर करावेत. अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे साखर आयुक्तांनी त्यानंतर कारखान्यांना आदेश दिले होते. माजी मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर या कारखान्यांनी देखील एफआरपीप्रमाणे दर दिलेला नाही. तर दुसरीकडे अजित पवार विधीमंडळात ३५०० रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी करीत आहेत. सुरुवातीला त्यांनीच आपल्याच कारखान्याच्या संचालक मंडळाला एफआरपी प्रमाणे दर जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी देखील एफआरपीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे येत्या २२ डिसेंबर रोजी माळेगाव, सोमेश्वर, छत्रपतीसह जिल्ह्यातील अन्य कारखान्यांवर देखील आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या जाहीर केलेल्या १८०० रुपये दरात शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज देखील फिटणार नाही. एफआरपीची रक्कम एकरकमी द्यावी, अशीही मागणी ढवाण यांच्यासह स्वाभिमानीचे महेंद्र तावरे, विठ्ठल देवकाते, अ‍ॅड. रोहन कोकरे, बाळासाहेब जगताप यांनी केली आहे. स्वाभिमानीच्या या आंदोलनात शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर आदी सहभागी होणार आहेत. एफआरपी प्रमाणे दर देऊन अजित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील कारखान्यांद्वारे कोंडी फोडावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)