शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 04:19 IST

नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत. या भागातील विहिरी व विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील शेतपिके व जनावरांचा ओला चारा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्र. ४२ व ४३ यांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. इंदापूरच्या पश्चिम भागातील वितरिकांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. आर्वतन सुरू होऊन ५० दिवस उलटले, तरीदेखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२ व ४३ ला पाणी सोडले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलच या भागातील विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नीरा डावा कालव्यावरील विनापरवाना सायफन जोरात सुरू असल्याने बड्या धेंडांची चलती होत आहे. तर, छोटे शेतकरी मात्र पाण्याची वाट पाहत आहेत. या भागात कालव्यावर अनधिकृत सायफनचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. त्यामुळे पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतीचे भरणे होत नाही. याचा फटका मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर मोहीम राबवून अनधिकृत सायफनधारकावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. या भागात राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत सायफन असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, या वर्षी उष्णतेची दाहकता जास्त आहे. इंदापूरच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने आपल्याला पिण्यासाठी पाणी सोडावे लागले. तसेच, या वर्षी उष्णतेमुळे पाण्याचे बष्पीभवन आणि शेतातदेखील पाणी जास्त द्यावे लागत आहे. या वितरिकांना पाणी सोडण्यास विलंब होत आहे. १४ तारखेला या वितरिकांना पाणी सोडू, असे त्यांनी सांगितले.