शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

१२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रुपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम -- या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ ...

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

--

या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, लालचंद कर्नावट, ॲड. माणिक पाटोळे, सुभाष टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. या शिष्यवृत्तीसाठी गुणवंत परंतु आई-वडील नसलेले, मागास प्रवर्गातील, आदिवासी, अंध-अपंग, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत ४६ विद्यार्थिनींना सुमारे २ लाख ९२ हजार रु., शारदाबाई पवार शिष्यवृत्ती अंतर्गत ४५ विद्यार्थिनींना सुमारे ३ लाख १८ हजार, साहेबरावजी बुट्टे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना ९२ हजार तसेच दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना सुमारे १ लाख ३० हजार असे एकूण ८ लाख ३३ हजार रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ८ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नुकतेच सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर पिंगळे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत अकौन्टसी विषयात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी आकांक्षा वाडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. माणिक पाटोळे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, धर्मराज पवळे, सी.ए. सागर पिंगळे, आकांक्षा वाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले, तर आभार प्रा. एस. एन. टाकळकर यांनी मानले.

फोटो ओळ: शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील व पदाधिकारी.

--

कोट

खेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आणि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते, या भावनेतून संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांची निवड पारदर्शकपणे केली आहे. या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारणासाठी करावा.

ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील