शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रुपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम -- या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ ...

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

--

या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, लालचंद कर्नावट, ॲड. माणिक पाटोळे, सुभाष टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. या शिष्यवृत्तीसाठी गुणवंत परंतु आई-वडील नसलेले, मागास प्रवर्गातील, आदिवासी, अंध-अपंग, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत ४६ विद्यार्थिनींना सुमारे २ लाख ९२ हजार रु., शारदाबाई पवार शिष्यवृत्ती अंतर्गत ४५ विद्यार्थिनींना सुमारे ३ लाख १८ हजार, साहेबरावजी बुट्टे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना ९२ हजार तसेच दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना सुमारे १ लाख ३० हजार असे एकूण ८ लाख ३३ हजार रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ८ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नुकतेच सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर पिंगळे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत अकौन्टसी विषयात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी आकांक्षा वाडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. माणिक पाटोळे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, धर्मराज पवळे, सी.ए. सागर पिंगळे, आकांक्षा वाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले, तर आभार प्रा. एस. एन. टाकळकर यांनी मानले.

फोटो ओळ: शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील व पदाधिकारी.

--

कोट

खेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आणि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते, या भावनेतून संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांची निवड पारदर्शकपणे केली आहे. या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारणासाठी करावा.

ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील