या वेळी सीमा संकपाळ, सरपंच संदिप डोमाळे,ग्रामविकास फाउंडेशनचे समनव्यक धनंजय गायकवाड, वनमजूर राजेंद्र बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, सुषमा गायकवाड, राहुल दिघे, युवा उद्योजक वैभव गायकवाड, सुनील गायकवाड, अमित गायकवाड, संतोष गायकवाड, स्वप्नील लवांडे, संदीप लवांडे, बाजीराव दिघे,ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल सांगडे, सुरेश घाडगे, शेतकरी बांधव, महिला भगिनी उपस्थित होत्या. याकन्या वन समृद्धी योजनेबाबत संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दांपत्याला १० रोपे विनामूल्य देऊन वृक्षसंवर्धन करण्यास प्रोत्साहित करणे, पर्यावरण वृक्षलागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इ.बाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सुरु करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे विभाग व सामाजिक वनीकरण वनविभाग, शिरूर, यांचेमार्फत आशा जालिंदर मोटे, सोनाली महेश घाडगे, अनिता गणेश ढसाळ यांना रोपवाटप करण्यात आले.
तसेच कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन व ग्रामपंचायत कोंढापुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी बांधवांना आंबा, नारळ, पेरू, चिंच, जांभूळ अशा फळ झाडांचे वाटप करण्यात आले.
कोंढापुरी येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत रोपे वाटप करण्यात आले.