शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना ४४ कोटी रूपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने ४४ कोटी रूपयांचे वाटप केले. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आणखी ४३ कोटी मिळतील. त्याचेही वाटप करणार आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके खराब झाली. अनेकांच्या जमिनीचेही नुकसान झाले. महसूल व जिल्हा कृषी यांच्या वतीने झालेल्या पाहणीनंतर जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आहे. शेतजमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ३९३ इतकी आहे. एकूण ७८ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसात खराब झाली. त्यातील खरीपातील पिके तर काढणीला आली होती. हातातोंडाला आलेला घास एकदम काढून घेतला गेल्याने शेतकºयांच्या दु:खाला पारावर नव्हता.

कृषी, महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे तयार केला. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ही सर्व आकडेवारी राज्य सरकारला सादर केली. एकूण ८७ कोटी रूपये नुकसानीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून प्रत्येकी २ हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. यापूर्वी ती जिरायती पिकाला हेक्टरी ६ हजार ९००, बागायती पिकाला हेक्टरी १३ हजार ५०० व फळ पिकालासाठी १८ हजार रूपये होती. राज्य सरकारने त्यात यावर्षी बदल केला असून आता जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाला हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

राज्य सरकारने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दिवाळीनंतर लगेचच ही रक्कम पाठवली. त्यातून महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ कोटी रूपयांचे वाटप केले आहे. केंद्र व राज्य सरकार अशा दोघांकडूनही मदत मिळत असते. केंद्रांकडून मिळणारी रक्कम केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता लगेचच जिल्हा प्रशासनाकडे येईल अशी माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे व त्यानंतर भाजीपाला, मका, रब्बी ज्वारी, जिरायती बाजरी, बटाटा, डाळिंब या पिकाचे झाले. पुरंदर तालुक्याचे सर्वात जास्त म्हणजे १५ हजार १९० हेक्टर नुकसान झाले. सर्वात कमी नुकसान वेल्हे तालुक्याचे, ४२३ हेक्टर इतके झाले.