शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना ४४ कोटी रूपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने ४४ कोटी रूपयांचे वाटप केले. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आणखी ४३ कोटी मिळतील. त्याचेही वाटप करणार आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके खराब झाली. अनेकांच्या जमिनीचेही नुकसान झाले. महसूल व जिल्हा कृषी यांच्या वतीने झालेल्या पाहणीनंतर जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आहे. शेतजमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ३९३ इतकी आहे. एकूण ७८ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसात खराब झाली. त्यातील खरीपातील पिके तर काढणीला आली होती. हातातोंडाला आलेला घास एकदम काढून घेतला गेल्याने शेतकºयांच्या दु:खाला पारावर नव्हता.

कृषी, महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे तयार केला. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ही सर्व आकडेवारी राज्य सरकारला सादर केली. एकूण ८७ कोटी रूपये नुकसानीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून प्रत्येकी २ हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. यापूर्वी ती जिरायती पिकाला हेक्टरी ६ हजार ९००, बागायती पिकाला हेक्टरी १३ हजार ५०० व फळ पिकालासाठी १८ हजार रूपये होती. राज्य सरकारने त्यात यावर्षी बदल केला असून आता जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाला हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

राज्य सरकारने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दिवाळीनंतर लगेचच ही रक्कम पाठवली. त्यातून महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ कोटी रूपयांचे वाटप केले आहे. केंद्र व राज्य सरकार अशा दोघांकडूनही मदत मिळत असते. केंद्रांकडून मिळणारी रक्कम केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता लगेचच जिल्हा प्रशासनाकडे येईल अशी माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे व त्यानंतर भाजीपाला, मका, रब्बी ज्वारी, जिरायती बाजरी, बटाटा, डाळिंब या पिकाचे झाले. पुरंदर तालुक्याचे सर्वात जास्त म्हणजे १५ हजार १९० हेक्टर नुकसान झाले. सर्वात कमी नुकसान वेल्हे तालुक्याचे, ४२३ हेक्टर इतके झाले.