शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना ४४ कोटी रूपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने ४४ कोटी रूपयांचे वाटप केले. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आणखी ४३ कोटी मिळतील. त्याचेही वाटप करणार आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके खराब झाली. अनेकांच्या जमिनीचेही नुकसान झाले. महसूल व जिल्हा कृषी यांच्या वतीने झालेल्या पाहणीनंतर जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आहे. शेतजमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ३९३ इतकी आहे. एकूण ७८ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसात खराब झाली. त्यातील खरीपातील पिके तर काढणीला आली होती. हातातोंडाला आलेला घास एकदम काढून घेतला गेल्याने शेतकºयांच्या दु:खाला पारावर नव्हता.

कृषी, महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे तयार केला. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ही सर्व आकडेवारी राज्य सरकारला सादर केली. एकूण ८७ कोटी रूपये नुकसानीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून प्रत्येकी २ हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. यापूर्वी ती जिरायती पिकाला हेक्टरी ६ हजार ९००, बागायती पिकाला हेक्टरी १३ हजार ५०० व फळ पिकालासाठी १८ हजार रूपये होती. राज्य सरकारने त्यात यावर्षी बदल केला असून आता जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाला हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

राज्य सरकारने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दिवाळीनंतर लगेचच ही रक्कम पाठवली. त्यातून महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ कोटी रूपयांचे वाटप केले आहे. केंद्र व राज्य सरकार अशा दोघांकडूनही मदत मिळत असते. केंद्रांकडून मिळणारी रक्कम केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता लगेचच जिल्हा प्रशासनाकडे येईल अशी माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे व त्यानंतर भाजीपाला, मका, रब्बी ज्वारी, जिरायती बाजरी, बटाटा, डाळिंब या पिकाचे झाले. पुरंदर तालुक्याचे सर्वात जास्त म्हणजे १५ हजार १९० हेक्टर नुकसान झाले. सर्वात कमी नुकसान वेल्हे तालुक्याचे, ४२३ हेक्टर इतके झाले.