शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना ४४ कोटी रूपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने ४४ कोटी रूपयांचे वाटप केले. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आणखी ४३ कोटी मिळतील. त्याचेही वाटप करणार आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके खराब झाली. अनेकांच्या जमिनीचेही नुकसान झाले. महसूल व जिल्हा कृषी यांच्या वतीने झालेल्या पाहणीनंतर जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आहे. शेतजमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ३९३ इतकी आहे. एकूण ७८ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसात खराब झाली. त्यातील खरीपातील पिके तर काढणीला आली होती. हातातोंडाला आलेला घास एकदम काढून घेतला गेल्याने शेतकºयांच्या दु:खाला पारावर नव्हता.

कृषी, महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे तयार केला. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ही सर्व आकडेवारी राज्य सरकारला सादर केली. एकूण ८७ कोटी रूपये नुकसानीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून प्रत्येकी २ हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. यापूर्वी ती जिरायती पिकाला हेक्टरी ६ हजार ९००, बागायती पिकाला हेक्टरी १३ हजार ५०० व फळ पिकालासाठी १८ हजार रूपये होती. राज्य सरकारने त्यात यावर्षी बदल केला असून आता जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाला हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

राज्य सरकारने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दिवाळीनंतर लगेचच ही रक्कम पाठवली. त्यातून महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ कोटी रूपयांचे वाटप केले आहे. केंद्र व राज्य सरकार अशा दोघांकडूनही मदत मिळत असते. केंद्रांकडून मिळणारी रक्कम केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता लगेचच जिल्हा प्रशासनाकडे येईल अशी माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे व त्यानंतर भाजीपाला, मका, रब्बी ज्वारी, जिरायती बाजरी, बटाटा, डाळिंब या पिकाचे झाले. पुरंदर तालुक्याचे सर्वात जास्त म्हणजे १५ हजार १९० हेक्टर नुकसान झाले. सर्वात कमी नुकसान वेल्हे तालुक्याचे, ४२३ हेक्टर इतके झाले.