शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

‘लोकमत काव्यऋतू’चे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 04:34 IST

प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे. 

ठळक मुद्देरंगणार पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिभावंत कवींचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या सुमारे २ हजारांहून अधिक कवितांतून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये योगिता पाटील (चोपडा, जळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक अँड. अशोक बनसोडे यांनी तर तृतीय क्रमांक पांडुरंग सुतार (जळगाव) यांनी मिळवला आहे. याशिवाय रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव), प्रा. मीनल येवले, डॉ. संजय कुलकर्णी (उदगीर), चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा), उमेश घेवरीकर (शेवगाव) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वातट्रिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव,  डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर, कवी संदीप खरे, कवी वैभव जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कवींना गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत. 

काव्यप्रेमींसाठी पर्वणीपुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकित कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कवीसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत. त्यामुळे काव्यप्रेमींसाठी ही खरी काव्यपर्वणी ठरणार आहे. 

टॅग्स :lokmat.com family No. 1lokmat.com फॅमिली No. 1