शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

संकटांना निर्भयपणे सामोरे जावे

By admin | Updated: July 3, 2017 03:36 IST

संकटे सगळ्यांच्या आयुष्यात येतात, त्यांना समजून घेऊन त्यांचा अभ्यास केला पाहिजे. संकटांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली तर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संकटे सगळ्यांच्या आयुष्यात येतात, त्यांना समजून घेऊन त्यांचा अभ्यास केला पाहिजे. संकटांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली तर आपल्याला हिंमत मिळेल. मन हा स्फूर्तीचा उधळलेला घोडा आहे. त्याला काबूत ठेवले तर तो तुमचे वाहन बनेल. त्यामुळे आपले मन हे बुद्धीने नियंत्रित करून संकटांना निर्भयपणे सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी केले. परमहंस स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन कोथरूड येथील मृत्युंजय मंदिर येथे करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अनिल अवचट यांच्या ‘संकटे आणि सामना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विश्वस्त हरिभाऊ वाघ, नृत्यांगना मनीषा साठे यांच्यासह डॉ. शैलजा मांडके आणि स्वच्छंदानंद गायत्री परिवाराचे सर्व सभासद उपस्थित होते. दि. १ ते ७ जुलैपर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अवचट म्हणाले, ‘संकटांचा द्वेष करु नका, त्यांना आपला मित्र बनवा. संकट नावाचा मित्रदेखील आपल्याला खूप काही शिकवून जातो. माणूस जेव्हा संकटातून बाहेर पडतो, तेव्हा तो अधिक चांगला माणूस बनतो. कारण, त्याने जीवन एका वेगळ्या चौकटीतून पाहिलेले असते. अशावेळीच माणसांची खरी किंमत कळते. संकटांमुळे विविध अनुभव आपल्या पाठीशी असतात. या अनुभवांमुळे शहाणपण आलेले असते.’पुणेकरांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. डॉ. शैलजा मांडके यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा साठे यांनी आभार मानले.३ जुलै रोजी निवेदक सुधीर गाडगीळ यांचे ‘मुलखावेगळी माणसं या विषयावर व्याख्यान होईल. ४ जुलै रोजी कविता खरवंडीकर व धनंजय खरवंडीकर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. ५ जुलै रोजी गुरुतत्त्वाचे विवेचन होणार आहे. ६ जुलै रोजी ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांच्या शिष्या व एसआयएसके शिष्य परिवार नृत्य सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाचा समारोप ७ जुलै रोजी प्रा. शैलजा मांडके यांचे ‘मनातले स्वच्छंद’ या विषयावरील प्रवचनाने होणार आहे.