शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हातवळण उपकेंद्राला अस्वच्छतेचा विळखा

By admin | Updated: October 10, 2015 05:05 IST

जागोजागी साचलेले पाणी, कचऱ्याचे साम्राज्य तसेच दवाखान्याच्या आवारात जनावरांचा असणारा वावर यामुळे हातवळण येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचेच आरोग्य धोक्यात आले होते

वरवंड : जागोजागी साचलेले पाणी, कचऱ्याचे साम्राज्य तसेच दवाखान्याच्या आवारात जनावरांचा असणारा वावर यामुळे हातवळण येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचेच आरोग्य धोक्यात आले होते. यामुळे दुसरीकडे दवाखान्याची इमारत बांधण्यात आली. या इमारतीचीही हीच अवस्था असल्याने येथील आरोग्यसेवेला ग्रहण लागले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातवळण (ता. दौंड) येथील ग्रामस्थांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची इमारात उभारण्यात आली. सुसज्ज असलेल्या या उपकेंद्राची देखभालीअभावी दुरवस्था झाली. जागोजागी साचलेले पाणी, कचरा तसेच आवारात जनावरांचा असलेला वावर यामुळे येथे येणाऱ्या ग्रामस्थांचेच आरोग्य धोक्यात आले होते. पावसाळ्यात या इमारतीत पाणी साचत असल्याने तसेच या ठिकाणी योग्य सेवा मिळत नसल्याने हे उपकेंद्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात या केंद्रासाठी पुन्हा दुसऱ्या जागी इमारात बांधण्यात आली. या इमारतीची अवस्थाही काही दिवसांत जुन्या इमारतीसारखी झाली. या उपकेंद्राच्या बाहेर वाहने लावणे, कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे येथे आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या नागरिकांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.