शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

उपस्थिती वरून विद्यापीठातील कर्मचा-यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्या लेखा परिक्षणाच्या (ऑडिट) कामासाठी विद्यापीठ प्रशासनाने हजर राहण्याबाबत कळवले आहे. मात्र, शासन नियमापेक्षा ...

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्या लेखा परिक्षणाच्या (ऑडिट) कामासाठी विद्यापीठ प्रशासनाने हजर राहण्याबाबत कळवले आहे. मात्र, शासन नियमापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बोलविले जात असल्याने कर्मचारी संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये झालेल्या पदनाम घोटाळ्यामुळे सर्व विद्यापीठांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. राज्यातील इतर सर्व विद्यापीठांचे लेखापरीक्षणाचे काम पूर्ण झाले असून केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लेखा परीक्षणाचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू झाला नाही.तसेच पदनाम घोटाळ्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीकडून विद्यापीठाच्या सर्व कागदपत्रांची पाहणी करून त्यावरील अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कर्मचा-यांना कामावर हजर राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यास कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने सर्व कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा या पत्रानुसार परिपत्रक प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले. परंतु, प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत स्वतंत्र तक्ता तयार करून त्यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत सूचना दिल्या. त्यात दररोज २० ते ५० टक्के कर्मचारीना बोलवले जात असल्याचे समोर आले.

गेल्या महिन्याभरात विद्यापीठातील सुमारे ६ ते ७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते उपचार घेत आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून कोरला काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला हवी ती मदत केली जात आहे. घर लहान असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण ५ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची विद्यापीठाच्या गेस्ट हाउस मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. विद्यापीठाकडून कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना उपस्थितीबाबत नियम का ? पाळले जात नाहीत, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.