शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आडसाली उसाच्या तोडी लांबल्या

By admin | Updated: December 25, 2015 01:49 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. वेळेत या उसाची तोडणी न झाल्यास साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरात कारखान्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दौंड तालुक्याचा पूर्व भागात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होत आहे. या पाण्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. त्यामुळे या भागाला उसाचे आगर समजले जाते. या भागाचे अर्थकारणच उसाच्या पिकावर अवलंबून आहे. राजेगाव गटात राजेगाव, मलठण, खानवटे, वाटलूज व नायगाव या गावांचा समावेश होतो. दर वर्षी या राजेगाव गटात सर्वसाधारणपणे १२५ ते १५० ऊसतोड करणाऱ्या टोळ्या असतात; परंतु या हंगामात फक्त ४० ते ५० एवढ्याच टोळ्या आहेत. राजेगाव परिसरात सध्या भीमा-पाटसच्या ७, बारामती अ‍ॅग्रोच्या ४, दौंड शुगरच्या २७, अंबालिकाच्या ३, कर्मयोगी (इंदापूर)च्या २ टोळ्या अशा एकूण ४३ टोळ्याच कार्यरत आहेत. त्यामुळे मजुरांअभावी १८ महिने झालेल्या आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. राजेगाव परिसरातील गावांना भीमा नदीचा किनारा लाभलेला असल्याने उजनी बॅकवॉटरचा फायदा होतो; त्यामुळे या भागात पाणी भरपूर आहे, असे समजून या भागात सर्वच कारखान्यांनी जाणीवपूर्वक टोळ्या कमी टाकलेल्या आहेत, असे एका कारखाना कामगारांनी सांगितले. परंतु, या गावातील ५० टक्के शेती ही खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे, तसेच या भागात झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका यांचे जलस्रोत आटू लागल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने ऊस जळू लागला आहे. सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड केलेली आहे त्या उसाला आता जवळजवळ १८ महिने होत आले आहेत. त्यातच पाणी कमी पडू लागल्याने ऊस जळू लागल्याने उसाच्या फुकाऱ्या होऊ लागल्या आहेत.