शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:55 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच, शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नैराश्य आल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ-सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेडच्या बॅकवॉटरवर असलेल्या रौंधळवाडी गावाच्या हद्दीत बबन सखाराम रौंधळ यांच्या घरासमोरील जलाशयात आत्महत्या केली. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्यासमोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दादही मागितली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुनर्वसन करा, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेड प्रशासनाने त्यातील पात्र-अपात्रच्या फेºयात खातेदारांना घेतले आहे. वारंवार असंख्य हेलपाटे मारूनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळांनी जलसमाधी घेतली.गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजूर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंबसंख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते पुरते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या २१होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते.