शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:55 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच, शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नैराश्य आल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ-सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेडच्या बॅकवॉटरवर असलेल्या रौंधळवाडी गावाच्या हद्दीत बबन सखाराम रौंधळ यांच्या घरासमोरील जलाशयात आत्महत्या केली. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्यासमोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दादही मागितली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुनर्वसन करा, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेड प्रशासनाने त्यातील पात्र-अपात्रच्या फेºयात खातेदारांना घेतले आहे. वारंवार असंख्य हेलपाटे मारूनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळांनी जलसमाधी घेतली.गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजूर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंबसंख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते पुरते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या २१होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते.