शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:55 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच, शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नैराश्य आल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ-सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेडच्या बॅकवॉटरवर असलेल्या रौंधळवाडी गावाच्या हद्दीत बबन सखाराम रौंधळ यांच्या घरासमोरील जलाशयात आत्महत्या केली. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्यासमोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दादही मागितली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुनर्वसन करा, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेड प्रशासनाने त्यातील पात्र-अपात्रच्या फेºयात खातेदारांना घेतले आहे. वारंवार असंख्य हेलपाटे मारूनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळांनी जलसमाधी घेतली.गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजूर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंबसंख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते पुरते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या २१होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते.