शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

सरकारी रुग्णालयांच्या सेवेवर नाराजी

By admin | Updated: July 2, 2017 02:21 IST

जनआरोग्य अभियानाच्यावतीने रुग्णसेवेबाबत सर्व स्तरातील नागरिकांकडून जाणून घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जनआरोग्य अभियानाच्यावतीने रुग्णसेवेबाबत सर्व स्तरातील नागरिकांकडून जाणून घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये सरकारी रुग्णालयांच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९९.५ टक्के लोकांनी मांडले. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची ९८.७ टक्के लोकांनी आवश्यकता व्यक्त केली. रुग्ण हक्काचा कायदा तातडीने झाला पाहिजे, असे मत ९९.४ टक्के लोकांनी व्यक्त केले.जनआरोग्य अभियानाद्वारे ‘आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा!’ या मोहिमे अंतर्गत, रुग्ण हक्कासाठी पुण्यात विविध ठिकाणी १५ ते ३० जून २०१७ दरम्यान प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले होते. या मतदानात शहर व जिल्ह्यातील गावे, सोसायट्या, वस्त्या, महाविद्यालये, हास्यक्लब, बचतगट, कंपन्या, वारी यामधून २१ हजार ३५१ मतदात्यांनी प्रत्यक्ष मतदान करून, तर ६७० लोकांनी आॅनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील ८० पेक्षा जास्त ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रातून सरकारी कर्मचारी व अधिकारी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी, कामगार, महिला, शेतकरी, शेतमजूर, वृद्ध नागरिक, भटके विमुक्त, रिक्षाचालक, हमाल, कचरावेचक, नर्सेस, डॉक्टर्स अशा समाजातील विविध स्तरातील (उच्च उत्पन्न गट ते गरीब वर्गातील) नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.शनिवारी या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. सरकारी हॉस्पिटलमधील सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी, असे मत २१ हजार २४७ (९९.५%) लोकांनी व्यक्त केले. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज २१ हजार ६७ (९८.७%) लोकांनी व्यक्त केली. रुग्णसेवेचा कायदा तातडीने व्हावा, अशी अपेक्षा २१ हजार २२५ (९९.४%) लोकांनी मतदानातून व्यक्त केली.मोठ्या खासगी व कॉपोर्रेट हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या फसवणुकीला कायद्याने आळा बसावा; व डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याबरोबरच रुग्णांचेही प्रश्न सोडवले जावेत; तसेच सरकारी दवाखान्यातील सेवांचा दर्जा सुधारावा या भूमिकेतून रुग्ण हक्कांसाठी मोहीम राबविण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून हे मतदान घेण्यात आले. सरकारी रुग्णालयांत अपेक्षेप्रमाणे सेवा मिळत नाही आणि खासगी रुग्णालयातील बाजारीकरण, अनावश्यक आॅपरेशन, अनावश्यक तपासण्या, अनावश्यक व महागडी औषधे, औषधांमधील कमिशनबाजी आणि स्टेंट, इम्प्लांट, लेन्समधील रुग्णालयांची प्रचंड नफेखोरीमुळे सामान्य माणूस हा मेटाकुटीला आला आहे, अशी भावना लोकांनी या मतदानाद्वारे मांडली आहे.रुग्ण हक्कांचा कायदा करण्यासाठी वाढला दबाव रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी, उपचारांच्या प्रमाणीकरणासाठी, रुग्णांच्या हक्कांसाठी, दर नियंत्रणासाठीचा केंद्र सरकारने २०१० साली कायदा केला आहे. त्याआधारे अनेक राज्यांनीही हा कायदा केला आहे. पण महाराष्ट्र सरकारने अद्याप त्यावर कार्यवाही केलेली नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात वैद्यकीय आस्थापना कायदा आणण्याचे सुतोवाच करण्यात आले होते; पण अद्याप त्याचा मसुदा तसाच पडून आहे. हा कायदा बनण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मतदानाच्या माध्यमतून ९९ टक्के लोकांनी ही मागणी केल्याने रुग्ण हक्काचा कायदा करण्यासाठी शासनावरील दबाव निश्चितच वाढला आहे.९९.५ टक्के लोकांनी सरकारी रुग्णालयांच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने ठोस व कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. ९८.७ टक्के लोकांनी खाजगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची आवश्यकता व्यक्त केली़