शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऊस विकास कृती कार्यक्रमअंतर्गत चर्चासत्र : नवीन साखर कारखाने नकोत - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:40 IST

काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

पुणे : काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. त्यामुळे यापुढे नवीन साखर कारखाने काढू नका, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे दिला.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, आमदार अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, राज्यात दोन वर्षात दुष्काळामुळे उसक्षेत्रात १० लाख हेक्टरने घट झाली. साखरेला भाव मिळत नाही.यांसह विविध कारणांमुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. साडेनऊ टक्के रिकव्हरी असताना प्रति टन २ हजार ५०० रुपये दर कसा द्यावा, हा प्रश्न आहे. कारखान्यांनी बनवलेली वीज कोणी घ्यायला तयार नाही. वीज निर्मितीचा खर्च जास्त असताना सरकार कमी दरामध्ये खरेदी करत आहे.अशाही स्थितीत काहींना कारखाना काढावा असे वाटते. या सर्व परिस्थितीत नवीन कारखाना काढून ते कसा चालवतात, हे पाहावे लागेल.साखर उद्योगात उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात असून आपली स्पर्धा त्यांच्याशी आहे. उसाचे घटलेले क्षेत्र, दर हेक्टरी उत्पादन, उतारा वाढविण्यासाठी काळजी घेतली नाही तर कारखानदारी अडचणीत येईल. त्यासाठी उस विकास कृती कार्यक्रमाचा गांभीर्याने विचार करून त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले. पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य शासन याबबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़साखर कारखान्यांनी वीज निर्मिती करण्याबाबत शासनाचेच धोरण असून त्यासाठी सवलत देण्याबरोबरच वीज खरेदीची हमी देते. कारखान्यांनी तयार केलेली वीज शासनाने घ्यायलाच हवी. पंतप्रधानांनीही सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज राज्यांना उपलब्ध करून देण्याबाबत भूमिका मांडली आहे. असे असताना राज्य शासन नकारात्मक भूमिका घेत आहे. याबाबत राज्य शासनासह पंतप्रधानांशी चर्चा करू.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष