शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

ऊस विकास कृती कार्यक्रमअंतर्गत चर्चासत्र : नवीन साखर कारखाने नकोत - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:40 IST

काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

पुणे : काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. त्यामुळे यापुढे नवीन साखर कारखाने काढू नका, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे दिला.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, आमदार अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, राज्यात दोन वर्षात दुष्काळामुळे उसक्षेत्रात १० लाख हेक्टरने घट झाली. साखरेला भाव मिळत नाही.यांसह विविध कारणांमुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. साडेनऊ टक्के रिकव्हरी असताना प्रति टन २ हजार ५०० रुपये दर कसा द्यावा, हा प्रश्न आहे. कारखान्यांनी बनवलेली वीज कोणी घ्यायला तयार नाही. वीज निर्मितीचा खर्च जास्त असताना सरकार कमी दरामध्ये खरेदी करत आहे.अशाही स्थितीत काहींना कारखाना काढावा असे वाटते. या सर्व परिस्थितीत नवीन कारखाना काढून ते कसा चालवतात, हे पाहावे लागेल.साखर उद्योगात उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात असून आपली स्पर्धा त्यांच्याशी आहे. उसाचे घटलेले क्षेत्र, दर हेक्टरी उत्पादन, उतारा वाढविण्यासाठी काळजी घेतली नाही तर कारखानदारी अडचणीत येईल. त्यासाठी उस विकास कृती कार्यक्रमाचा गांभीर्याने विचार करून त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले. पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य शासन याबबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़साखर कारखान्यांनी वीज निर्मिती करण्याबाबत शासनाचेच धोरण असून त्यासाठी सवलत देण्याबरोबरच वीज खरेदीची हमी देते. कारखान्यांनी तयार केलेली वीज शासनाने घ्यायलाच हवी. पंतप्रधानांनीही सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज राज्यांना उपलब्ध करून देण्याबाबत भूमिका मांडली आहे. असे असताना राज्य शासन नकारात्मक भूमिका घेत आहे. याबाबत राज्य शासनासह पंतप्रधानांशी चर्चा करू.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष