शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातून बारामाही पद्धत आकारणी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

नारायणगाव : कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असल्याने लाभक्षेत्रातील पाणी वापरकर्त्या शेतकऱ्यांना ऊस व फळबाग पिकांसाठी बारामाही पद्धतीची ...

नारायणगाव : कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असल्याने लाभक्षेत्रातील पाणी वापरकर्त्या शेतकऱ्यांना ऊस व फळबाग पिकांसाठी बारामाही पद्धतीची आकारणी सुरू करण्यात आली असून, ही आकारणी अन्यायकारक असून कृष्णा खोरे विकास महामंडळाने परिपत्रकातील नमूद केलेले मुद्दे रद्द करण्यात यावे. पूर्वीप्रमाणेच हंगामनिहाय पाणीपट्टीची आकारणी करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राज्याचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी केली आहे.

बाळासाहेब औटी यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत चुकीच्या आकारणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषेदला पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर उंडे, देवराम तट्टू, ग्राहक पंचायतीचे जगन्नाथ खोकराळे, संदीप अदक,अशोक भोर आदी उपस्थित होते.

जलसंपदामंत्री यांचेकडे केलेल्या मागणीत त्यांनी परिपत्रकातील नमूद केलेले मुद्दे रद्द करण्यात यावे अशी मागणी आहे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी ७ मे २०२१ रोजी परिपत्रकाव्दारे बारमाही पद्धतीने ऊस व फळबाग पिकांची आकारणी करावी, असे आदेश काढले आहेत. कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असून बारमाही आकारणी केल्यास बारा महिने पाण्याची हमी देणार का ? तसेच आठमाही पाणीपरवाने बारमाही करून देणार का ? याचा खुलासा नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांनी त्वरित जाहीर करावा अशी मागणी बाळासाहेब औटी यांनी केली आहे.

लाभधारक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, भिजणारे पूर्ण क्षेत्र द्यावे व पाण्यावरील आपला हक्क अबाधित ठेवावा. कालवा, धरण व चाऱ्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची १५ दिवसांत दखल न घेतली गेल्यास लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने कुकडी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलन सुरु करणार असा इशारा बाळासाहेब औटी यांनी दिला आहे.

--

चौकट

पाणीवापर संस्थांना २००५ च्या कायद्यान्वये पीक पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र दिले असताना त्या पाणी वापर संस्थांच्या लाभक्षेत्रातील पिकांची बारमाही आकारणी करण्याचे आदेश दिले आहे. हा निर्णय पाणीवापर संस्थांचे अस्तित्व संपुष्टात येऊन २००५ चा कायदा मोडीत काढणारे आहे. पाटबंधारे खात्याचे पाणी वापर संस्था प्रोत्साहन देण्याऐवजी संस्था बरखास्त करण्याकडे कल दिसून येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागात मंजूर पदाच्या १० टक्के देखील कर्मचारी कार्यरत नाही. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. कुकडी प्रकल्पातील लाभक्षेत्रातील विहिरीवर भिजणारे क्षेत्र लाभक्षेत्रातून वगळण्याचे काम चालू आहे. त्याबाबत शेतकऱ्याकडून क्षेत्र वगळण्याचे फॉर्म भरून घेतले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असे फॉर्म भरून घेणे अन्यायकारक आहे त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे.