शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शिक्षकांमध्ये असंतोष, ८० संघटनांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:20 IST

शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील सर्व ८० संघटनांनी एकजुटीने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

बारामती : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील सर्व ८० संघटनांनी एकजुटीने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. शाळा बंद करून आझाद मैदान येथे सर्व संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारीला काढण्यात येणाºया इशारा मोर्चाच्या वेळी राज्यव्यापी आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार आहे. माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.पुणे येथे नुकतीच सर्व शिक्षक आमदार व शिक्षण विभागातील ८० संघटनांची एकत्रित बैठक राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात झाली. प्राथमिक शिक्षकांची राज्यभर तब्बल २५,००० पदे रिक्त आहेत. शासनाने वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. खासगी कंपन्यांना शाळा चालविण्यास परवानगीचे धोरण गोरगरीब मुलांच्या मुळावर येणार आहे. त्यामुळे खासगीकरणास विरोधाचा ठराव करण्याचे सर्व संघटनांनी ठरविले आहे. मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदल्यांबाबत वादग्रस्त धोरण राबविण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. सर्वसमावेशक बदली धोरण तयार करून प्रशासकीय बदल्या तालुक्यांतर्गत व्हाव्यात. अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या विनंती बदल्या विनाअट कराव्यात, यासाठी समानिकरणाची अट शिथील करण्याची शिक्षकांची मागणी आहे.वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुधारित आदेश रद्द करावा, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व विनाअनुदानीत शाळांना अनुदान द्यावे, यासह माध्यमिक व महाविद्यालयीन विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी अंगणवाडी ते महाविद्यालयापर्यंत सर्व शिक्षण क्षेत्र एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात हे आंदोलन होणार आहे, अशीमाहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.>राज्यभर आंदोलनराज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यापूर्वी शासनास जागे करण्यासाठी पुणे येथील राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर १२ फेब्रुवारी रोजी सर्व संघटनांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात इशारा मोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या इशारा मोर्चाच्या वेळी राज्यव्यापी आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.केजी टू पीजी आंदोलनशिक्षणक्षेत्रातील अस्वस्थता सरकारला समजत नाही. त्यामुळे बालवाडीपासून प्राध्यापकांपर्यंत म्हणजेचकेजी टू पीजी हे सारे शिक्षणक्षेत्र आंदोलनात उतरणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी सांगितले.