शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

कचरा वर्गीकरणाची शिस्त अंगलट

By admin | Updated: January 12, 2015 02:31 IST

शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी

पुणे : शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी, म्हणून महापालिकेकडून सोसायट्यांंमधून मिश्र कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. मात्र, ही शिस्त आता महापालिकेच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका कचरा घेत नसल्याने नागरिकांकडून शेकडो टन कचरा रात्रीच्या वेळी जागा मिळेल तिथे टाकण्यात येत आहे. हा कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी ढीग साचले असून, दुर्गंधी पसरली आहे.शहरात दररोज सुमारे १५०० ते १६०० टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा पालिकेच्या काही मोजक्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर तसेच उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. हा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ जानेवारीपासून कचरा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर आठ दिवसांनंतर ८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला़ शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेस नवीन प्रकल्प उभारता यावेत, त्यासाठी महापालिकेस उरुळी देवाची येथील डेपोमध्ये पुढील ९ महिने कचरा कॅपिंगमध्ये घेण्याची मुदतवाढ उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र, ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यानंतरच शहरातील कचरा शहरात जिरविण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या होत्या. त्याअंतर्गत ज्या सोसायट्यांकडे कचरा प्रकल्प आहेत, त्यांचा ओला कचरा न घेणे, वर्गीकरण असल्याशिवाय घंटागाडीत कचरा न घेणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम होत असल्याचे दिसते.