शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वर्गीकरणाची शिस्त अंगलट

By admin | Updated: January 12, 2015 02:31 IST

शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी

पुणे : शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी, म्हणून महापालिकेकडून सोसायट्यांंमधून मिश्र कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. मात्र, ही शिस्त आता महापालिकेच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका कचरा घेत नसल्याने नागरिकांकडून शेकडो टन कचरा रात्रीच्या वेळी जागा मिळेल तिथे टाकण्यात येत आहे. हा कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी ढीग साचले असून, दुर्गंधी पसरली आहे.शहरात दररोज सुमारे १५०० ते १६०० टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा पालिकेच्या काही मोजक्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर तसेच उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. हा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ जानेवारीपासून कचरा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर आठ दिवसांनंतर ८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला़ शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेस नवीन प्रकल्प उभारता यावेत, त्यासाठी महापालिकेस उरुळी देवाची येथील डेपोमध्ये पुढील ९ महिने कचरा कॅपिंगमध्ये घेण्याची मुदतवाढ उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र, ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यानंतरच शहरातील कचरा शहरात जिरविण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या होत्या. त्याअंतर्गत ज्या सोसायट्यांकडे कचरा प्रकल्प आहेत, त्यांचा ओला कचरा न घेणे, वर्गीकरण असल्याशिवाय घंटागाडीत कचरा न घेणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम होत असल्याचे दिसते.