शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जिल्हा प्रशासनासाठी आपत्तीचे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात पुण्यात सापडला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठला व देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद झाली ती आजही कायम आहे.

कोरोनाच्या उपाय-योजनामध्ये प्रशासन व्यस्त असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ येऊन थडकले आणि शेकडो लोकांचे घरसंसार, शेतीवाडी उध्वस्त करून गेले. कोरोना, चक्रीवादळाचे संकट कमी की काय ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या सर्व संकटांना प्रशासनाला तोंड द्यावे लागले.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली की सर्व जबाबदारी महसूल विभागावर येते. आतापर्यंत आलेल्या हजारो संकटाना समर्थपणे थोड देखील दिले आहे. परंतु सन २०२० या वर्षात संकटे पाठ सोडायचे नावच घेऊना अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर काही दिवस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. जगात कोरोनाचा उद्रेक होत असला तरी आपल्याकडे पहिला रुग्ण सापडल्यानंतर ठोस उपाय योजना करण्याऐवजी चाचपणीच करत राहिले.

पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी एटक उपाय योजना केल्या असत्या तर कदाचित परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रण राहिली असती. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ३ लाख ६१ हजार ५९६ लोकांना कोरोनाची लागण झाली व ८ हजार ७९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.

कोरोना महामारीच्या उपाय-योजनामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊसाने प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि भोर, वेल्हा या पावसाच्या तालुक्यांना झोडपून काढले. यात हजारो लोकांचे घरसंसार वादळ-वा-यात वाहून गेले. काही जिवंत हानी सोबत शेकडो जनावरे मरण पावली, तर तब्बल २९ हजार ७७९ शेतकऱ्यांचे ७७ कोटींचे नुकसान झाले.

ऑक्टोबर महिन्यांत चक्रीवादळाच्या संकटातून वाचलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक धुवाधार पाऊस बरसला आणि सुमारे १८ लोकांसह अनेक जनावरे, घरे या अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सुमारे ९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या एकापाठोपाठ आलेल्या संकटांमुळे ‘हुश्श संपले एकदाचे हे वर्ष’ अशीच भावना प्रशासनाने व्यक्त केली तर आश्चर्य वाटायला नको.