शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्हा प्रशासनासाठी आपत्तीचे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात पुण्यात सापडला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठला व देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद झाली ती आजही कायम आहे.

कोरोनाच्या उपाय-योजनामध्ये प्रशासन व्यस्त असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ येऊन थडकले आणि शेकडो लोकांचे घरसंसार, शेतीवाडी उध्वस्त करून गेले. कोरोना, चक्रीवादळाचे संकट कमी की काय ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या सर्व संकटांना प्रशासनाला तोंड द्यावे लागले.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली की सर्व जबाबदारी महसूल विभागावर येते. आतापर्यंत आलेल्या हजारो संकटाना समर्थपणे थोड देखील दिले आहे. परंतु सन २०२० या वर्षात संकटे पाठ सोडायचे नावच घेऊना अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर काही दिवस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. जगात कोरोनाचा उद्रेक होत असला तरी आपल्याकडे पहिला रुग्ण सापडल्यानंतर ठोस उपाय योजना करण्याऐवजी चाचपणीच करत राहिले.

पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी एटक उपाय योजना केल्या असत्या तर कदाचित परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रण राहिली असती. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ३ लाख ६१ हजार ५९६ लोकांना कोरोनाची लागण झाली व ८ हजार ७९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.

कोरोना महामारीच्या उपाय-योजनामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊसाने प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि भोर, वेल्हा या पावसाच्या तालुक्यांना झोडपून काढले. यात हजारो लोकांचे घरसंसार वादळ-वा-यात वाहून गेले. काही जिवंत हानी सोबत शेकडो जनावरे मरण पावली, तर तब्बल २९ हजार ७७९ शेतकऱ्यांचे ७७ कोटींचे नुकसान झाले.

ऑक्टोबर महिन्यांत चक्रीवादळाच्या संकटातून वाचलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक धुवाधार पाऊस बरसला आणि सुमारे १८ लोकांसह अनेक जनावरे, घरे या अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सुमारे ९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या एकापाठोपाठ आलेल्या संकटांमुळे ‘हुश्श संपले एकदाचे हे वर्ष’ अशीच भावना प्रशासनाने व्यक्त केली तर आश्चर्य वाटायला नको.