शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

जिल्हा प्रशासनासाठी आपत्तीचे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात पुण्यात सापडला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठला व देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद झाली ती आजही कायम आहे.

कोरोनाच्या उपाय-योजनामध्ये प्रशासन व्यस्त असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ येऊन थडकले आणि शेकडो लोकांचे घरसंसार, शेतीवाडी उध्वस्त करून गेले. कोरोना, चक्रीवादळाचे संकट कमी की काय ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या सर्व संकटांना प्रशासनाला तोंड द्यावे लागले.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली की सर्व जबाबदारी महसूल विभागावर येते. आतापर्यंत आलेल्या हजारो संकटाना समर्थपणे थोड देखील दिले आहे. परंतु सन २०२० या वर्षात संकटे पाठ सोडायचे नावच घेऊना अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर काही दिवस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. जगात कोरोनाचा उद्रेक होत असला तरी आपल्याकडे पहिला रुग्ण सापडल्यानंतर ठोस उपाय योजना करण्याऐवजी चाचपणीच करत राहिले.

पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी एटक उपाय योजना केल्या असत्या तर कदाचित परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रण राहिली असती. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ३ लाख ६१ हजार ५९६ लोकांना कोरोनाची लागण झाली व ८ हजार ७९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.

कोरोना महामारीच्या उपाय-योजनामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊसाने प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि भोर, वेल्हा या पावसाच्या तालुक्यांना झोडपून काढले. यात हजारो लोकांचे घरसंसार वादळ-वा-यात वाहून गेले. काही जिवंत हानी सोबत शेकडो जनावरे मरण पावली, तर तब्बल २९ हजार ७७९ शेतकऱ्यांचे ७७ कोटींचे नुकसान झाले.

ऑक्टोबर महिन्यांत चक्रीवादळाच्या संकटातून वाचलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक धुवाधार पाऊस बरसला आणि सुमारे १८ लोकांसह अनेक जनावरे, घरे या अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सुमारे ९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या एकापाठोपाठ आलेल्या संकटांमुळे ‘हुश्श संपले एकदाचे हे वर्ष’ अशीच भावना प्रशासनाने व्यक्त केली तर आश्चर्य वाटायला नको.